भारतीय संघाचा युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत आता संघाचा नियमित खेळाडू बनला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी त्याच्यावर संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे. एमएस धोनी भारताचा एक अप्रतिम यष्टीरक्षक फलंदाज आणि कर्णधार होता. आता भविष्यात पंतला धोनीच्या उत्तराधिकारीच्या रूपात पाहिले जात आहे. अशातच आता पंतने तो यष्टीरक्षक बनण्यामागचे कारण सांगितले आहे.

रिषभ पंत (Rishabh Pant) म्हटल्याप्रमाणे त्याच्या वडिलांकडून त्याला यष्टीरक्षक बनण्यासाठी प्रेरणा मिळाली होते. पंत इंडियन प्रीमियर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे आणि ही जबाबदारी त्याने चांगल्याप्रकारे पार पाडली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ९ जूनपासून सुरू होणाऱ्या टी-२० मलिकेत पंत संघाचा उपकर्णधार आणि केएल राहुल कर्णधार असणार आहे.

पंतने तो यष्टीरक्षक फलंदाज कसा बनला? याविषयी खुलासा केला. तो म्हणाला की, “मला याविषयी काहीच माहिती नाहीये की, मी चांगला यष्टीरक्षक फलंदाज आहे की नाही. मी फक्त दररोज माझे १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत असतो. मी पहिल्यापासूनच एक यष्टीरक्षक फलंदाज आहे. मला लहानपणापासून यष्टीरक्षण करायचो. कारण, माझे वडीलही यष्टीरक्षक होते.”

“जर तुम्हाला यष्टीरक्षक बनायचे असेल, तर तुम्ही चपळ असणे करजेचे आहे. जर तुम्ही चपळ असाल, तर तुम्हाला त्याचा फायदा होत असतो. दुसरी गोष्ट ही आहे की, तुम्हाला शेवटपर्यंत चेंडूकडे पाहावे लागते. अनेकदा काय होते की, तुम्हा पाहत असता की, चेंडू येत आहे आणि तुम्हा धीर घेता. परंतु तुम्हाला चेंडूकडे शेवटपर्यंत पाहायचे असते,” असेही पंतने पुढे बोलताना सांगितले.

पंतने त्याच्या इथपर्यंतच्या कारकिर्दीत अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याच्या प्रदर्शनाच्या जोरावर भारताने कसोटी मालिकेतील शेवटचा सामना जिंकला होता. हा सामना गाबा स्टेडियमवर खेळला गेला असून भारताने या विजयानंतर कसोटी मालिका नावावर केली होती. अशाच प्रकारे त्याने इतरही काही महत्वाच्या मालिका जिंकवून दिल्या आहेत.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या-

ठरलं तर! एका वर्षात १०० टक्के होणार २ आयपीएल; असं आम्ही नाही, तर ‘हा’ दिग्गज म्हणतोय

‘विश्वचषक खेळायचा असेल, तर त्याने वनडे क्रिकेट खेळण्याचा धोका पत्करू नये’, ‘या’ खेळाडूला शास्त्रींचा सल्ला

‘चार पेग मारल्यानंतर…’, रुटला सार्वकालिन महान खेळाडू म्हणताच नेटकऱ्यांनी ‘दादा’चा घेतला समाचार