रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्धचची तीन टी20 सामन्यांची मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. त्यानंतर अवघ्या तीन दिवसांनी पुन्हा एकदा भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तिरुअनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (28 सप्टेंबर) भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेशी तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन हात करेल. टी20 विश्वचषकापूर्वी आपल्या चुका सुधारण्याची भारतीय संघाकडे ही शेवटची संधी असेल. त्याचवेळी संघाचा अनुभवी फलंदाज विराट कोहलीला या मालिकेत कर्णधार रोहित शर्माला एका मोठ्या विक्रमात मागे टाकण्याची संधी आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र, विराटकडे पहिल्या क्रमांकावर पोहचण्याची नामी संधी आहे. हा पराक्रम करण्यासाठी विराटला केवळ 35 धावांची गरज आहे. विराटला रोहित आणि न्यूझीलंडच्या मार्टिन गुप्टिल यांनी मागे टाकत पहिल्या दोन क्रमांकावर उडी घेतली होती. मात्र, आशिया चषक स्पर्धेत अफलातून कामगिरी करत विराट पुन्हा एकदा दुसऱ्या क्रमांकावर परतला आहे. या स्पर्धेतत्याने आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये पहिले शतक झळकावले होते. तेव्हापासूनच तो वेगाने धावा करत रोहितच्या नजीक आला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहित सध्या 3694 धावांसह अव्वल स्थानावर आहे. त्याने आतापर्यंत 139 सामन्यांमध्ये चार शतके झळकावलीत. त्याचबरोबर कोहलीने 107 टी20 सामन्यांमध्ये 3660 धावा केल्या आहेत. गप्टिल 3497 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर कायम आहे. आयर्लंडचा पॉल स्टर्लिंग 3011 धावांसह चौथ्या आणि पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम 84 सामन्यांत 2939 धावांसह पाचव्या क्रमांकावर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टी-20 हा फलंदाजांचा खेळ’, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्याआधी आफ्रिकी गोलंदाजांचे मोठे विधान
भारताविरुद्धच्या टी-20 मालिकेविषयी दक्षिण आफ्रिकी कर्णधाराचे मोठे विधान, पाहा काय म्हणाला बावुमा