---Advertisement---

माजी क्रिकेटरने रोहित-कोहलीला दिला खास सल्ला; श्रीलंका मालिकेपूर्वी गौतम गंभीरबद्दलही स्पष्टचं बोलला

team india t20 world cup combination advice from wasim jaffer
---Advertisement---

भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेला पोहचला आहे. गाैतम गंभीरच्या हेड कोचपदाच्या कार्यकाळातील टीम इंडियाची ही पहिलीच मालिका आहे. गाैतम गंभीरला सोबत घेऊन निवड समितीने टी20 आणि एकदिवसीय संघात शानदार खेळाडूंना संघात स्थान दिले आहे. तर एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्माला स्थान देण्यात आले आहे. या दरम्यान अशिष नेहराने रोहित शर्मा आणि कोहलीला खास सल्ला देताना त्याने प्रशिक्षकाशी मैत्रीपूर्ण राहावे, जेणेकरून ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगले राहील, असे म्हटले आहे.

स्पोर्ट्स तकशी बोलताना आशिष नेहरा म्हणाला, “टी-20 विश्वचषकानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटमधून ब्रेक घेतील असे वाटत होते. पण असे झाले नाही. तो श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळणार आहे. गौतम गंभीर संघाचा नवा प्रशिक्षक आहे. आता या सर्वांनी एकमेकांमध्ये मिसळले पाहिजे, ज्यामुळे ड्रेसिंग रूममध्ये चांगले वातावरण तयार होईल. तुम्ही एकमेकांना किती वर्षांपासून ओळखता याने काही फरक पडत नाही.”

2027 च्या विश्वचषकाबद्दल बोलताना नेहरा पुढे म्हणाला, “तुम्ही खेळाबद्दल किती प्रेरित आहात यावर ते अवलंबून आहे. पण जर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा विचार केला तर ते कसे हाताळायचे हे त्यांना चांगले माहीत आहे. कारण इथून पुढे तुमचे वय वाढेल. युवा खेळाडूंवरही लक्ष ठेवावे लागणार आहे. शुबमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि साई सुदर्शन यांसारखे खेळाडू तोपर्यंत चांगले तयार झाले असतील.

भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर तीन टी20 आंतरराष्ट्रीय आणि तितक्याच एकदिवसीय सामने खेळणार आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या वेळापत्रकानुसार, पहिला टी20 आंतरराष्ट्रीय सामना 26 जुलै रोजी होणार होता, परंतु आता तो 27 जुलै रोजी होणार आहे. यानंतर 28 जुलै आणि 30 जुलै रोजी दोन टी-20 सामने होणार आहेत. सर्व सामने पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवले जातील. पहिला एकदिवसीय सामना 2 ऑगस्टला खेळवला जाईल. यानंतर उर्वरित वनडे सामने 4 आणि 7 ऑगस्टला होतील.

महत्त्वाच्या बातम्या-

वर्ल्डकपमध्ये खराब कामगिरी, विश्नविजेता कर्णधार बनणार का इंग्लंडचा नवा मुख्य प्रशिक्षक?
कोहलीच्या कारकिर्दीत फक्त ‘एकच’ गोष्ट शिल्लक…, माजी भारतीय कर्णधाराबद्दल युनूस खानचे मोठे विधान
राहुल आरसीबीत; रोहित-बुमराह अन् सूर्या मुंबईची साथ सोडणार? आयपीएल 2025 पूर्वी सर्व मोठे अपडेट्स जाणून घ्या

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---