विशाखापट्टण। भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारपासून(2 ऑक्टोबर) पहिला कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात पहिल्या डावात फलंदाजी करत असताना भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने दिडशतकी खेळी केली आहे.
त्याने 244 चेंडूत 176 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 23 चौकार आणि 6 षटकार मारले. विशेष म्हणजे रोहितने पहिल्यांदाच कसोटी सलामीवीर म्हणून फलंदाजी केली आहे. त्यामुळे त्याच्या नावावर खास विक्रम झाला आहे.
रोहित कसोटी सलामीवीर म्हणून पहिला डाव खेळताना 150 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी करणारा केवळ दुसराच भारतीय ठरला आहे.
याआधी भारताकडून असा पराक्रम केवळ शिखर धवनने केला आहे. धवनने 2013 ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटीत पदार्पण करतानाच सलामीला फलंदाजी केली होती. त्यावेळी त्याने सलामीवीर म्हणून खेळताना 187 धावांची खेळी केली होती.
कसोटी सलामीवीर म्हणून पहिला डाव खेळताना सर्वाधिक धावांची खेळी करणारे भारतीय फलंदाज –
187 – शिखर धवन (भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2013)
176 – रोहित शर्मा (भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, 2019)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–द्विशतक हुकले पण तरीही रोहितचा झाला या दिग्गजांमध्ये समावेश
–अखेर ८२ षटकानंतर दक्षिण आफ्रिकेला मिळाली टीम इंडियाची पहिली विकेट…