भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा यांच्यात वाद असल्याच्या बातम्या कायम चर्चेत राहतात. इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो करण्यापासून भारतीय संघात दोन गट पडल्याच्या बातम्या कायम माध्यमांमध्ये चर्चेत येत असतात. या दोन्ही दिग्गज फलंदाजांनी बर्याच वेळा या वादाच्या बातम्या चुकीच्या असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीही बातम्या येतच असतात की विराट व रोहितमध्ये सर्व काही अलबेल नाही.
दरम्यान रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील संबंध कसे आहेत याची माहिती दिली आहे. लाड यांनी इंडिया टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “विराट व रोहित यांच्यात काही वाद आहे असे मला वाटत नाही. दोघांनीही नेहमीच देशाची सेवा केली आहे आणि दोघेही चांगली कामगिरी करत आहेत. यामुळेच भारतीय संघ सामना जिंकण्यास यशस्वी होत आहे.”
दिनेश लाड यांना विचारले गेले की, नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून फिरत होते. तसेच रवि शास्त्रींसोबत त्यांचा ताळमेळही उत्तम दिसत होता. यासंदर्भात आपले काय मत आहे.
यावर दिनेश लाड म्हणाले की, “दोघांमधील संबंध चांगले नाहीत या बातमीचा मागे प्रसार झाला होता. पण या दोघांमध्ये वाद आहे असं मला कधीच वाटलं नाही. जर संघाला विजय मिळवायचा असेल तर खेळाडूंमध्ये चांगले समन्वय असले पाहिजे. मी या दोघांमध्ये नेहमीच चांगला ताळमेळ पाहिला आहे. दोघेही देशाची सेवा करत आहेत. आपण पाहतो की जेव्हा दोघे बाद होतात तेव्हा संघ संकटात सापडतो.”
अर्थातच लाड यांच्या या वक्तव्यावरुन स्पष्ट होते की विराट व रोहितमध्ये कुठलाही वाद नसून दोघेही संघासाठी उत्तम कामगिरी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सचिन तेंडुलकरने प्रचंड वेदनेत असून देखील खेळली होती ‘ती’ सिरीज, रॉबिन उथप्पाने केला खुलासा
बुढ्ढा होगा तेरा बाप! ४५ वर्षाच्या ‘या’ खेळाडूने पाडला १५ चौकार आणि १५ षटकारांचा पाऊस
टी२० विश्वचषकाचे यजमानपद भारत गमावणार? या देशात होऊ शकते आयोजन