---Advertisement---

‘एवढं सगळं करुन काय उपयोग झाला?’, हतबल रोहित शर्माने केले मोठे विधान

Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय संघाचा स्टार फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्मा याचे विश्वचषक विजयाचे स्पन मागच्या वर्षी अपूर्ण राहिले. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना गुरुवारी (25 जानेवारी) हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना सुरू होण्याआधी कर्णधार रोहित शर्माने विश्वचषकाबाबत मनातील विश्वचषक जिंकण्याची इच्छा पुन्हा एकदा बोलून दाखवली.

मागच्या वर्षी आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ODI World Cup 2023) भारतात खेळला गेला. यजमान भारतीय संघ स्पर्धेच्या सुरुवातीपासून विजेतेपदासाठी दावेदार मानला जात होता. संपूर्ण विश्वचषकात भारताने प्रदर्शन देखील जबरदस्त केले आणि अंतिम सामन्यात स्थानही मिळवले. अंतिम सामन्यात पोहोचेपर्यंत भारतीय संघ अजिंक्य राहिला होता. ऑस्ट्रेलियाने मात्र अंतिम सामन्यात भारताचा विजयरथ रोखला आणि पुन्हा एकदा वनडे विश्वचषकाचे मानकरी ठरले. वनडे विश्वचषकाच्या इतिहिसात ऑस्ट्रेलियन संघ मागच्या वेळी सहाव्यांदा विश्वचषक विजेता ठरला. भारतीय संघ मात्र आपल्या तिसऱ्या विश्वचषक विजयाच्या अगदी जवळ जाऊन पराभूत झाले. संघातील सर्व खेळाडू आणि कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्यासाठी हा पराभव नक्कीच निराशाजनक होता.

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक याने जिओ सिनेमासाठी रोहितची मुलाखत घेतली. हैदराबाद कसोटीला सुरूवात होण्याआदी कर्णधाराच्या मनातील विश्वचषक जिंकण्याची तिव्र इच्छा चाहत्यांसमोर आली. कार्तिकसोबत बोलताना रोहित म्हणाला, “मी 2019 विश्वचषकात 5 शतके केली होती. काय झाले, आम्ही पराभूत झालो. या आकड्यांना खूप कमी महत्व आहे. मला विजेतेपद मिळवायचे आहे. आम्ही अंतिम सामन्यातील अडथळा पार करू शकलो नाही. पण मला वाटते आम्ही तोही पार करू.”

दरम्यान, 2019 वनडे विश्वचषक रोहितच्या चाहत्यांना नेहमी लक्षात राहणारा होता. सलामीवीर फलंदाजाने विश्वचषकाच्या या हंगामात सर्वाधिक 648 धावा केल्या होत्या. यात 5 शतके आणि एक अर्धशतकाचा समावेश होता. असे असेल तरी, भारतीय संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला. उपांत्य सामन्यात इंग्लंडने भारताला मात दिली आणि पुढे अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध विजय देखील मिळवला. वनडे विश्वचषक 2023 मध्येही रोहितचे प्रदर्शन चांगले राहिले. कर्णधाराच्या रुपात खेळातना रोहितने 597 धावा केल्या. यात 3 शतके आणि 6 अर्धशतकांचा समावेश होता. (Rohit Sharma expressed his desire to Dinesh Karthik about winning the World Cup)

महत्वाच्या बातम्या – 
IND vs ENG: आता जडेजाला ‘सर’ म्हणायला हरकत नाही, केलाय न मोडता येणारा विक्रम
नाद खुळा! जगातील सर्वोत्तम क्रिकेटर रुटला २ भारतीयांनी केलंय नको-नको

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---