भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला गुरुवारी हैद्राबाद इथे सुरुवात झाली. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. इंग्लंडच्या कोणत्याच खेळाडूला पहिल्या डावात चमकदार कामगिरी करता आली नाही. इंग्लंडची फलंदाजी भारतीय फिरकीपटूंपुढे अक्षरश: कोलमडून पडली. फॅब ४मधील दिग्गज फलंदाज ज्यो रुटला देखील विशेष काही कामगिरी करता आली नाही.
रुटने ६० चेंडूंचा सामना करताना २९ धावा केल्या, त्याला रविंद्र जडेजाने जसप्रीत बुमराहकडे झेल द्यायला भाग पाडले. याबरोबर रविंद्र जडेजाने रुटला चक्क ९ वेळा बाद करण्याचा कारनामा केला. याबरोबर जडेजाच्या नावावर एक खास विक्रम झाला. ज्यो रुटला सर्वाधिक वेळा बाद करणारा फिरकीपटू म्हणून यापुढे त्याकडे पाहिले जाणार आहे.
ज्यो रुटला सर्वाधिक वेळा बाद करणारे फिरकीपटूंमध्ये रविंद्र जडेजा (९वेळा), नेथन लायन (८वेळा) आणि आर अश्विन (७वेळा) या फिरकीपटूंचा नंबर लागतो. विशेष म्हणजे याच सामन्यात जडेजा-अश्विन जोडीने एक खास कारनामा केला. एकत्र खेळताना ५०० विकेट घेणारी जडेजा-अश्विन दुसरी जोडी बनली आहे. यापुर्वी असा विक्रम अनिल कुंबळे-हरभजन सिंग जोडीने केला होता.
हेही वाचा
IND vs ENG: टीम इंडियातून आवेश खानला का बाहेर काढण्यात आलं? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण
AUS vs WI: कोरोनाची लागण झाल्यानंतरही कॅमेरून ग्रीन खेळला सामना, पाहा आयसीसीने काय घेतला निर्णय