---Advertisement---

‘तो भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा खेळाडू’, वाचा रोहितने सामना जिंकल्यानंतर का गायले चहलचे गोडवे?

On: सोमवार, जुलै 18, 2022 10:29 AM
Yuzvendra-Chahal-Rohit-Sharma
---Advertisement---

भारतीय कर्णधार रोहित शर्माने ५ सामन्यांची एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर सांगितले की, काही गोष्टींमध्ये सुधारणा आवश्यक आहे. पण पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये संघाने ज्याप्रकारे कामगिरी केली आहे, ती अभूतपूर्व आहे. निर्णायक सामन्यात इंग्लंडला ५ विकेट्सने पराभूत करून मालिका २-१ ने जिंकल्यानंतर रोहितने सांगितले की, निकालामुळे खूप आनंद झाला आहे. एक संघ म्हणून आम्हाला पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये काहीतरी साध्य करायचे होते आणि आम्ही ते केले. त्याने लेगस्पिनर चहल (युझवेंद्र चहल) बद्दलही मोठी चर्चा केली. भारतीय संघाने तिसरा एकदिवसीय सामना ५ गडी राखून जिंकला. प्रथम खेळताना इंग्लंडने २५९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ४ बळी घेतले. त्यानंतर रिषभ पंतच्या शानदार १२५ धावांच्या जोरावर संघाने ४२.१ षटकांत लक्ष्य गाठले. याआधी संघाने टी-२० मालिकाही २-१ अशी जिंकली होती.

रोहित शर्मा म्हणाला की, “पुढे जाण्यासाठी, आम्हाला काही गोष्टींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, परंतु प्रयत्नांमुळे मी आनंदी आहे. मागच्या वेळी आम्ही इथे हरलो होतो. येथे जिंकणे सोपे नाही. आम्हाला हे रिषभ आणि हार्दिककडून पाहायला मिळाले, दोघेही चमकदार खेळले. ते घाबरले आहेत असे कुठेच दिसत नव्हते. त्याने उत्तम फटके खेळले.

चहल संघातील महत्त्वाचा सदस्य
युझवेंद्र चहलबाबत तो म्हणाला की, तो संघाचा अत्यंत महत्त्वाचा सदस्य आहे. त्याच्याकडे खूप अनुभव आहे आणि तो सर्व फॉरमॅटमध्ये गोलंदाजी करत आहे. गेल्या टी-२० विश्वचषकात तो खेळला नाही हे दुर्दैव आहे. पण तो ज्या पद्धतीने परतला आहे त्यामुळे मी खूश आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला ११३ चेंडूत १६ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद १२५ धावा केल्याबद्दल ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आले, तर हार्दिक पंड्याला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ म्हणून गौरवण्यात आले. पंड्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारताला मालिका २-१ ने जिंकण्यात मोलाची भूमिका बजावली.

समस्यानिवारकांची भूमिका बजावत पंड्या आणि पंत यांनी पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली आणि संघाला संकटातून बाहेर काढले. यावर पांड्या म्हणाला की, आम्हाला त्याची (पंत) प्रतिभा माहित आहे. आज तो परिस्थितीनुसार खेळला. आमच्या भागीदारीने सामना बदलला आणि त्याने ज्या पद्धतीने सामना संपवला तो खास होता. इंग्लंडने २०१५ नंतर घरच्या मैदानावर तिसरी एकदिवसीय मालिका गमावली आणि विशेष म्हणजे तिन्ही मालिकेतील निर्णायक सामना ओल्ड ट्रॅफर्ड येथे झाला.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

‘याच’ ४ खेळाडूंच्या जोरावर भारताने विश्वविजेत्यांना त्यांच्या धर्तीवर लोळवलंय

HAPPY BIRHDAY। धवन-पंतच्या प्रशिक्षकांनी सांगितलेलं ‘हा पुढे जाऊन धोनीची जागा चालवणार…’

सात वर्षांपासून इंग्लंडवर टीम इंडियाचीच ‘सत्ता’! वाचा गर्व करणारी आकडेवारी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---