शनिवारी (22 एप्रिल) मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील रोमांचक लढत चाहत्यांना अनुभवता आली. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी केली. प्रथम फलंदाजीला आलेल्या पंजाबने 20 षटकात 8 बाद 214 धावा केल्या. प्रत्युत्तरात मुंबईचे फलंदाज 201 धावांपर्यंतच मजल मारू शकले. 19व्या षटकापर्यंत मुंबई सामना जिंकणार, अशी परिस्थिती होती. मात्र, शेवटच्या षटकात अर्शदीपने जबरदस्त प्रदर्शन करून पंजाबला विजय मिळवून दिला. मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने सामना गमावल्यानंतर आपल्या खेळाडूंवर विश्वास कायम असल्याचे सांगितले.
शेवटच्या षटकात अर्शदीप सिंग गोलंदाजीला आला आणि मुंबईच्या दोन खेळाडूंचा त्रिफळा उडवला. सामना संपल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “आमच्याकडून काही चुका झाल्या, पण आम्ही याकडे जास्त लक्ष देणार नाही. आपले मनोबल कायम ठेवा, असे आम्ही खेळाडूंना सांगू. आम्ही आतापर्यंत सहा सामन्यांपैकी तीन सामन्यात विजय, तर तीन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. आम्हाला स्पर्धेत ठिकून राहणे गरजेचे आहे.”
मुंबईसाठी या सामन्यात सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि कॅमरून ग्रीन (Cameron Green) यांनी अर्धशतके ठोकली. या दोघांच्या खेळीमुळे मुंबईच्या आशा शेवटच्या षटकापर्यंत कायम राहिल्या. कर्णधार रोहिने देखील सूर्यकुमार आणि ग्रीनच्या या प्रदर्शनाची दखल घेतली. रोहित म्हणाला, “सूर्यकुमार आणि ग्रीन यांनी चांगली गोलंदाजी केली आणि आम्हाला शेवटपर्यंत घेऊन गेले. अर्शदीपला त्याच्या गोलंदाजीचे श्रेय दिले गेले पाहिजे. आज आमचा दिवस नव्हता, पण आम्ही चांगली टक्कर दिली.”
दरम्यान, मुंबईसाठी या सामन्यात कॅमरून ग्रीनने 43 चेंडूत 67 धावा कुटल्या. तर दुसरीकडे सूर्यकुमारने 26 चेंडूत 57 धावांची वादळी खेळी केली. 13 चेंडूत 25 धावा करून टिम डेविड शेवटपर्यंत खेळपट्टीवर कायम राहिला. तत्पूर्वी पंजाब किंग्जचा कर्णधार सॅम करून याने 29 चेंडूत 55 धावांची खेळी केली होती. नियमित कर्णधार शिखर धवन दुखापतीमुले सलग तिसऱ्या सामन्यात खेळू शकला नाही आणि ग्रीनकडे संघाचे कर्णधारपद आले. ग्रीनला या सामन्यातील प्रदर्शनासाठी सामनावीर निवडले गेले. मुंभईने 13 धावांनी पराभव स्वीकारला. (Rohit Sharma’s reaction after accepting defeat against Punjab Kings)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या घातक यॉर्करने दोनदा मोडला मिडल स्टंप! आयपीएलला मोठे नुकसान
अर्शदीपने स्टंप्ससह तोडले मुंबईकरांचे हृदय! अखेरच्या षटकात पंजाबचा 13 धावांनी विजय