दक्षिण अफ्रिका आणि भारत (sa vs ind odi series) यांच्यात सध्या तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना बुधवारी दक्षिण अफ्रिकेने ३१ धावांनी जिंकला आणि १-० अशी आघाडी घेतली. भारताला पहिल्या सामन्यात पराभव मिळाल्यानंतर अनेकांनी भारतीय संघ आणि खेळाडूंवर निशाणा साधला. आता या यादीत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बट (salman butt) देखील सामील झाला आहे. त्याने कर्णधार केएल राहुल (kl rahul) आणि यष्टीरक्षक रिषभ पंत (rishabh pant) यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
रोहित शर्मा दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही आणि एकदिवसीय संघाची कमान केएल राहुलच्या हातात आली. परंतु केएल राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ पराभूत झाल्यामुळे त्याच्यावर चाहते टीका करत आहेत. पाकिस्तानचा दिग्गज सलमान बटच्या मते, यष्टीरक्षक रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर केले पाहिजे. तर राहुलने त्याच्या जागी यष्टीरक्षण करायला हवे. तसेच, रिषभ पंतच्या जागी इशान किशन किंवा ऋतुराज गायकवाड यांच्यापैकी एकाला संधी मिळाली पाहिजे. पहिल्या सामन्यात भारतीय संघाचा मध्यक्रम पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे बटने हा सल्ला दिला आहे.
दुसऱ्या सामन्यासाठी भारतीय संघाला सल्ला देत बट म्हणाले की, “भारतीय संघाला जर मधली फळी मजबूत करायची असेल, तर त्यांनी एक फलंदाज अधिक खेळवला पाहिजे. तसेच रिषभ पंतला बाहेर करून केएल राहुल यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडू शकतो.” बटच्या मते भुवनेश्वर कुमार देखील संघातून बाहेर झाला पाहिजे. त्याच्या म्हणण्यानुसार, भुवनेश्वरचा वेग जास्त नाहीये आणि त्याच्या जागी वेगात चेंडू फेकणाऱ्या एखाद्याला संधी मिळाली पाहिजे.
बटने केएल राहुलच्या नेतृत्वावर देखील प्रश्न उपस्थित केले आहेत. बट म्हणाले की, “विराट कोहली मैदानात जो उत्साह घेऊन येत होता, तो पहिल्या एकदिवसीय सामन्यात दिसला नाही. शेवटी हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे. जेव्हा तुम्ही कोणाला जबाबदारी देता, तेव्हा त्याच्यामध्ये खूप बदलाव येतो, पण कर्णधारातील उत्साह गायब दिसला. तो वेगळा विचार करण्यात अयशस्वी ठरला. तुम्हाला विरोधी संघाला तुमच्या रणनीतीविषयी सतत विचार करण्यास भाग पाडायचे असते आणि केएल यामध्ये अपयशी ठरला.”
दरम्यान, दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना पार्लमधील बोलँड पार्कमध्ये २१ जानेवारीला खेळला जाणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना महत्वाचा आहे. जर या सामन्यात भारत पराभूत झाला, तर मालिका देखील हातातून निसटेल. आधीच भारताने कसोटी मालिकेत १-२ असा पराभव पत्करला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बंगाल-बेंगलोर सामना ठरला ऐतिहासिक! नबीबक्षच्या ८ गुणांच्या ‘तांत्रिक’ रेडने बंगालची पुनरागमनासह सरशी
गुजरात-थलाईवाज सामन्याने गाठली रोमांचकतेची परिसीमा! सुपर-सब प्रवीणच्या सुपर रेडने जायंट्स विजयी
गब्बरने सांगितले निराशेतून बाहेर येण्याचे गुपित; म्हणाला, “या गोष्टी आयुष्यात…”
व्हिडिओ पाहा –