श्रीलंका विरुद्ध भारत संघात शुक्रवारी (२३ जुलै) वनडे मालिकेतील तिसरा आणि अखेरचा कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी भारताच्या अंतिम ११ जणांच्या संघात तब्बल ६ बदल करण्यात आले. या सामन्यासाठी भारतीय संघात पाच खेळाडूंनी पदार्पण केले. यष्टीरक्षक संजू सॅमसन याने या सामन्यातून वनडे पदार्पण करत तब्बल सहा वर्षांहून अधिक काळाचा वनवास संपवला.
भारतीय संघात सहा बदल
आजच्या सामन्यामध्ये भारतीय संघात सहा बदल केले गेले. यष्टीरक्षक संजू सॅमसन, फलंदाज नितीश राणा, लेगस्पिनर राहुल चाहर, अष्टपैलू कृष्णप्पा गौतम व डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारिया यांनी वनडे पदार्पण केले. वेगवान गोलंदाज नवदीप सैनीदेखील ऑस्ट्रेलिया दौ-यानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात उतरेल.
संजू सॅमसनचा संपला वनवास
केरळ क्रिकेट संघाचा कर्णधार संजू सॅमसनचे वनडे दुखापतीमुळे दोन सामन्यांसाठी लांबले होते. आज यष्टीरक्षक इशान किशनच्या जागी त्याला संधी मिळाली. कर्णधार शिखर धवनने त्याला कॅप प्रदान केली. तो आंतरराष्ट्रीय वनडे सामन्यात प्रतिनिधित्व करणारा भारताचा २४१ वा क्रिकेटपटू बनला. त्याने या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना ४६ धावांची शानदार खेळी केली.
वनडे पदार्पण करताच संजू सॅमसनने ६ वर्ष आणि ४ दिवसांचा वनवास संपवला. टी२० पदार्पण केल्यानंतर वनडे पदार्पणासाठी इतके दिवस वाट पाहणारा तो एकमेव भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. त्याने १९ जुलै २०१५ रोजी झिम्बाब्वेविरुद्ध टी२० पदार्पण केले होते.
याबाबतीत दुसऱ्या क्रमांकावर अष्टपैलू कृणाल पंड्या असून त्याला टी२० पदार्पणानंतर वनडे पदार्पणासाठी २ वर्ष १३९ दिवसांची प्रतीक्षा करावी लागली होती. याच सामन्यातून वनडे पदार्पण करणारा लेगस्पिनर राहुल चाहर यालादेखील १ वर्ष ३५१ दिवसानंतर वनडे पदार्पणाची संधी मिळाली. रिषभ पंतने टी२० पदार्पणानंतर पहिला वनडे खेळण्यासाठी १ वर्ष २६२ दिवस वाट पाहिलेली.
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंकाचे प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यात वादादरम्यान काय झाले होते बोलणे? वाचा सविस्तर
विरोधी संघातून कोहली अन् शास्त्रींना मोठा सल्ला, पंतबाबत सांगितली ‘ही’ महत्त्वपुर्ण गोष्ट
Video: नाणेफेक जिंकल्यानंतर उरला नाही ‘गब्बर’च्या आनंदाला पारावार, केले भन्नाट सेलिब्रेशन