शुक्रवार (22 जुलै) रोजी उत्तर प्रदेशचा क्रिकेटपटू सौरभ कुमारने आपली प्रेयसी नेहा सैबीशी विवाह केला आहे. हे दोघे एकमेकांना मागील 8 वर्षांपासून ओळखतात आणि एकमेकांवर प्रेम देखील करतात. आता त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांनी काल लग्नही केले.
सौरभचा गाझियाबादमध्ये साध्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला. आपली खूप जुनी मैत्रीण नेहा हिला आपली अर्धांगिनी बनवण्याचा निर्णय त्याेॉने घेतला आहे. याच दरम्यानचे फोटो देखील सौरभने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
उत्तर प्रदेशमधील त्याच्या अनेक सहकारी क्रिकेटपटूंनी सौरभचे अभिनंदन केले आहे. त्याचबरोबर कुलदीप यादव आणि अंकित राजपूत व्यतिरिक्त दीपक हूडा यांनीही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
लग्नाचे फोटो पोस्ट करत सौरभ कुमारने एक सुंदर कॅप्शनही लिहिले आहे की, ‘या सर्व घटनेवर माझा विश्वासच बसत नाही. आम्ही गेली 8 वर्षे एकत्र आहोत. माझं आयुष्य तुझ्यासोबत खूप सुंदर आहे. एखाद्या व्यक्तीला इतके दिवस प्रेम करणे आणि त्या खास व्यक्तीशी लग्न करणे खूप चांगले वाटते. तू खरोखर देवाचा आशीर्वाद आहेस.’
इंडियन प्रीमियर लीग 2021 साठी सौरभ कुमारला पंजाब किंग्जने 20 लाख रुपयांना खरेदी केले होते. परंतु असे असूनही या हंगामाच्या पहिल्या टप्प्यात त्याला संधी मिळाली नाही. तर युएईमध्ये होणार्या आयपीएल 2021 च्या दुसर्या टप्प्यात बरेच खेळाडू उपलब्ध राहणार नाहीत. अशा परिस्थितीत सौरभला संधी मिळेल अशी सर्वांना अपेक्षा आहे. यूएईमध्ये हे सामने सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होणार आहेत.
सौरभ कुमारने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2015-16 मध्ये 8 जानेवारी रोजी देशांतर्गत टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. रणजी करंडक 2017-18 मध्ये उत्तर प्रदेशकडून त्याने चार सामन्यांत 23 गडी बाद केले होते. फेब्रुवारी 2017 मध्ये त्याला रायझिंग पुणे सुपरगिजंट्स संघाने १० लाखात खरेदी केले होते. जुलै 2018 मध्ये इंडिया ब्ल्यूसाठी 2018-19 दुलीप करंडकासाठी त्याला संघात स्थान देण्यात आले होते. त्याने तीन सामन्यांत 19 गडी बाद केल्याने या स्पर्धेत तो अग्रगण्य विकेट घेणारा गोलंदाज होता.
डिसेंबर 2018 मध्ये हरियाणाविरूद्ध 2018–19 च्या रणजी करंडक सामन्यात कुमारने सामन्यात 65 धावा देऊन चौदा विकेट घेतले होते. 2018-19 रणजी करंडकातील गट टप्प्यात उत्तर प्रदेशकडून नऊ सामन्यांत 51 गडी बाद करून त्याने अव्वल स्थान मिळवले होते. त्याने दहा सामन्यांत 51 बळी मिळवून स्पर्धा पूर्ण केली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
अय्योव! चक्क घोड्यावर स्वार होऊन नाणेफेकीसाठी पोहोचला कर्णधार, लोकांचा सेल्फीसाठी गदारोळ
टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून होईल भारताचा पराभव, दिग्गज क्रिकेटपटूचा मोठा दावा
श्रीलंका संघाला क्लीन स्वीप होण्यापासून वाचवू शकते ‘ही’ एक गोष्ट; वाचा कुठली आहे ती गोष्ट