आक्रमक शैली आणि तरुण खेळाडूंना पुढे आणण्याच्या बाबतीत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली हे नेहमी पुढे असायचे. ज्यावेळी सौरव गांगुली हे भारतीय संघाचे कर्णधार होते त्यावेळी त्यांनी खूप नवीन खेळाडूंना संधी दिली होती आणि त्या खेळाडूंनी देखील त्यांची विश्वासार्हता कायम जपल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आजही त्यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल त्यांचे चाहते त्यांना अजून देखील आठवतात आणि सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून आजही ते नावाजले जातात.
गांगुलीनंतर भारतीय संघाची कमान सांभाळणारा एमएस धोनी आणि गांगुली यांच्या नेतृत्वात आपणास अनेक फरक पाहावयास मिळतात. परंतु दोघांनी देखील आपल्या संघाला पुढे न्यायचे, हेच ध्येय ठरवले होते. क्रिकेट मध्ये बरेच चढ उत्तर हे येतच राहतात आणि त्यातूनच पुढे कस जायचं हे माणूस नेहमीच शिकत असतो. सौरव गांगुली यांनी ज्यावेळी एमएस धोनीच्या खांद्यावर आपल्या भारतीय संघाला पुढे न्यायची जबाबदारी टाकली तेव्हा काही बदल पाहावयास मिळाले.
एमएस धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघात अनेक तरुण खेळाडू आले आणि आपापल्या परीने सर्वोत्कृष्ट खेळ देखील सादर केला. तर बरेच खेळाडू फ्लॉप देखील झाले असल्याचे दिसून येते. मात्र गांगुली यांच्या नेतृत्वाखाली आपला सर्वोत्कृष्ट खेळ करणारे असेही काही खेळाडू आहेत ज्यांना एमएस धोनीने फारसा पाठिंबा दिला नाही. आजच्या या लेखात आपण अशाच तीन खेळाडूंबद्दल जाणून घेऊया.
१) मोहम्मद कैफ –
भारताच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणात मोहम्मद कैफचे नाव आजतागायत घेतले जाते. मात्र आपल्या कारकिर्दीत २००६ साल कैफला खडतर गेले. त्यावर्षी कैफ फार खास प्रदर्शन करू शकला नाही. त्यामुळे ते वर्ष कैफला कठीण गेले असल्याचे म्हंटले जाते. पण सौरव गांगुली यांनी नेहमीच त्याला पाठिंबा दर्शविला होता. परंतु कैफला पुढेही विशेष कामगिरी न करता आल्याने भारतीय संघातून वगळण्यात आले आणि त्यानंतर तो पुन्हा संघात परतला देखील नाही. ज्यावेळी कैफ संघाच्या बाहेर होता त्यावेळी एमएस धोनी हा भारतीय संघाचा कर्णधार होता.
२) दिनेश मोंगिया –
भारतीय संघासाठी २००३ मध्ये विश्वकरंडक खेळलेल्या दिनेश मोंगियामध्ये प्रतिभेची अजिबात उणीव नव्हती. त्याला सौरव गांगुली यांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. भारतीय संघाच्या पहिल्या टी-२० सामन्यात देखील तो खेळला होता, परंत एमएस धोनीच्या नेतृत्वात मोंगियाला पहिल्या टी-२० विश्वचषकात स्थान मिळाले नाही. मात्र आजगायत तो जनतेच्या मनात आपल्या चांगल्या खेळामुळे स्थान टिकवून आहे.
३) युवराज सिंग –
भारतीय संघाला २०११ चा विश्वचषक जिंकून देणारा आणि कर्करोग सारख्या गंभीर आजारातून बाहेर येणाऱ्या युवराज सिंग याला मोठ्या प्रमाणात सौरव गांगुली यांचा पाठिंबा होता. परंतु आपल्या आजारपणातून परत आल्यावर काही स्पर्धांमध्ये युवराज सिंगला खेळण्याची संधी मिळाली पण संघात सतत स्थान टिकवण्यात युवराजला यश मिळाले नाही. युवराज सिंगला भारतीय संघात ठेवायला हवे होते असे बहुतेक जणांचे म्हणणे होते, परंतु एमएस धोनीने जो पाठिंबा युवराज सिंगला द्यायला पाहिजे होता, तो दिला नसल्याने युवराजने देखील आपल्या निवृत्तीची घोषणा केली होती.
महत्वाच्या बातम्या:
बापरे बाप! सामना चालू असताना भर मैदानात कोसळली शिडी, पाहा काळजात धडकी भरवणारा व्हिडिओ
पत्रकार परिषद चालू असतांना मुलाने वडिलांकडे केला लेस बांधून देण्याचा हट्ट, पुढे काय झाले ते पाहाच..
विराट कोहली जर आगामी टी-२० किंवा वनडे विश्वचषक जिंकला नाही, तर नेतृत्वबदल होणार हे नक्की!