इंडियन प्रीमियर लीग 2023 हंगाम अंतिम टप्प्यात आली आहे. गुजरात टायटन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ प्लेऑफमध्ये स्थान पक्के करू शकले आहेत. रविवारी (27 मे) आयपीएलचा अंतिम सामना रंगणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. 7 जून रोजी इंग्लंडच्या द ओव्हल स्टेडियमवर ही लढत रंगणार आहे. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यापूर्वी भारतीय संघातील दोन खेळाडू संघ व्यवस्थापनाची चिंता वाढवताना दिसत आहेत.
भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. मागच्या वेळी भारताला डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यावेळी भारतासमोर डब्ल्यूटीसीची गदा इंचावण्याआधी बलाढ्य ऑस्ट्रेलियन संघाचे आव्हान आहे. तसे पाहिले तर न्यूझीलंडचे तुलनेत ऑस्ट्रेलियन संघ कसोटी क्रिकेट खेळण्यात माहीर मानला जातो. अशात भारतासाठी हा विजय नक्कीच सोपा नसेल.
भारतीय संघात मागच्या काही महिन्यांमध्ये खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र सुरू आहे. जसप्रीत बुमराह मागच्या बऱ्याच महिन्यांपासून दुखापतीमुळे संघातून बाहेर आहे. बुमराहपाठोपाठ मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात रिषभ पंतही अपघातात झालेल्या दुखापतीमुळे संघातून बाहेर झाला. पंतच्या पुनरागमनालाही अजून बराच काळ जाणार आहे. श्रेयस अय्यर मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळताना दुखापतग्रस्त झाला होता. तर केएल राहुल आयपीएल 2023 दरम्यान दुखापतीमुळेच लीगमधून बाहेर पडला. असात या चौघांची दुखापत देखील भारतासाठी चिंतेची बाब ठरत आहे.
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज करत आहेत. या दोघांनीही आयपीएल 2023मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. अशात डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात खेळताना दोघेही पूर्ण आत्मविश्वासह मैदानात उतरतील. या दोघांच्या साधीला उमेश यादव आणि शार्दुल ठाकूर हे दोन वेगवान गोलंदाजही संघात आहेत. इंग्लंडच्या खेळपट्टीवर भारतीय संघ जर चार वेगवान गोलंदाजांसह खेळला, तर उमेश आणि शार्दुलला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील केले जाऊ शकते.
उमेश आणि शार्दुलला जरी या इंग्लंड दौऱ्यासाठी निवडले गेले असले, तरी या दोगांचे आयपीएल प्रदर्शन मात्र खूपच सुमार राहिले आहे. शार्दुलने कोलकाता नाईट रायडर्ससाठी यावर्षी 11 सामन्यांमध्ये 31.42 च्या सरासरीने सात विकेट्स घेतल्या आहेत. सोबतच फलंदाजाच्या रूपात त्याने 20.36 च्या सरासरीने 113 धावा केल्या आहेत. दुसरीकडे आपल्या उमेश यादवचे प्रदर्शन अधिकच सुमार दिसले आहेत. उमेशने यावर्षी केकेआरसाठी आठ सामन्यांमध्ये 189 धावा खर्च केल्या आहेत आणि फक्त एक विकेट घेतली आहे. अशात तिसऱ्या वेगवान गोलंदाजाच्या रूपात संघ व्यवस्थापन कोणाला संधी देणार, हे पाहण्यासारखे असेल. या दोघांव्यतिरिक्त फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा हेदेखील इंग्लंडमध्ये अपयशी ठरण्याची शक्यता आहे. कारण इंग्लंडमधील परिस्थिती फिरकी गोलंदाजीसाठी भारताइतकी अनुकूल नाहीये.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सचिनकडून कौतुक होताच मॅचविनर गिलने शेअर केला शर्टलेस फोटो, 3 तासात पडला 1 मिलियन लाईक्सचा पाऊस
संपलाय रे तो! IPL 2023 दिनेश कार्तिकचा शेवटचा हंगाम? खराब सिझनविषयी आली मोठी प्रतिक्रिया