श्रीलंका आणि भारत यांच्यादरम्यानच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने श्रीलंकेला ७ गडी राखून पराभूत केले. पृथ्वी शॉ आणि इशान किशन हे भारताच्या विजयाचे नायक ठरले. शॉने २४ चेंडूत ४३ धावा केल्या, तर किशनने पदार्पणातील वनडे सामन्यात ४२ चेंडूत ५९ धावा चोपल्या. त्यांच्या या खेळामुळे आगामी टी२० विश्वचषकासाठी भारताच्या संघात स्थान मिळवण्यासाठी दोन अनुभवी खेळाडूंना अवघड होऊ शकते.
हे खेळाडू गमावू शकतात जागा
पृथ्वी शॉ व इशान किशन यांनी पहिल्या वनडे सामन्यात तुफानी फटकेबाजी करत आगामी टी२० विश्वचषकासाठी सलामीवीर म्हणून दावा ठोकला. त्यांच्यामुळे अनुभवी शिखर धवन व केएल राहुल यांना संघात स्थान मिळवण्यासाठी अडचणी येऊ शकतात. कारण धवन आणि राहुल हे या युवा खेळाडूं इतके आक्रमक फलंदाज मानले जात नाहीत. अशातच सलामीला रोहित शर्माच्यासोबत शॉ आणि इशान यांच्या नावाचा विचार होऊ शकतो.
अनुभवाच्या बाबतीत ठरू शकतात सरस
शॉ आणि इशान हे युवा आक्रमक फलंदाज असले तरी अनुभवाच्या बाबतीत ते धवन व राहुल यांच्या तुलनेत पिछाडीवर आहेत. कारण, हे दोन्ही खेळाडू अनेक वर्षांपासून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करतात तर, शॉ आणि इशानने नुकतीच कारकीर्दीची सुरुवात केलीय. सध्या स्थगित असलेल्या २०२१ आयपीएलमध्ये धवन सर्वाधिक धावा काढणारा पहिला तर राहुल दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे.
स्वतः विराट आहे पर्याय
टी२० विश्वचषकात सलामीचा विचार केल्यास रोहित शर्मासह कर्णधार विराट कोहलीदेखील पर्याय ठरू शकतो. कारण, तो आयपीएलमध्ये आपल्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघासाठी सलामीवीराची भूमिका बजावतो. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी२० मालिकेतील अखेरच्या सामन्यात त्याने रोहित शर्मासह ९४ धावांची वेगवान सलामी दिली होती.
टी२० विश्वचषक निवडीचे व्यासपीठ आहे श्रीलंका दौरा
आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ बऱ्याच अंशी तयार आहे. केवळ काही मोजक्या जागा भरण्यासाठी अखेरचे व्यासपीठ म्हणून श्रीलंका दौर्याकडे पाहिले जातेय. अशा परिस्थितीत श्रीलंकेत सर्वोत्तम कामगिरी करण्याचे लक्ष युवा खेळाडूंचे असेल. टी२० विश्वचषकाला १७ ऑक्टोबरपासून युएई व ओमान येथे सुरुवात होईल. स्पर्धेचा अंतिम सामना १४ नोव्हेंबर रोजी खेळला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या –
वाढदिवस विशेष: दुसरा हर्षा भोगले होणे नाही…
दुर्दैव! पदार्पणाची संधी असतानाही कोलंबो वनडेला मुकला सॅमसन, आता संपूर्ण दौऱ्यातूनही बाहेर?
‘आधीच सगळ्यांना सांगितलं होतं, कुणीही असो, पहिल्या चेंडूवर षटकार मारणारच,’ ईशानचा उलगडा