नव्या वर्षात सुरू होत असलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या वनडे व टी20 मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. वनडे संघाचे नेतृत्व रोहित शर्मा तर टी20 संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या हा करताना दिसेल. असे असताना या संघात अनेक महत्त्वाचे बदल पाहण्यास मिळाले. काही काळापर्यंत भारतीय संघाचा प्रभारी वनडे कर्णधार असलेला शिखर धवन हा दोन्ही संघात जागा मिळवण्यात अपयशी ठरला. त्यामुळे एक वेळ भारताचा पहिल्या पसंतीचा सलामीवीर असलेल्या शिखरची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपल्यात जमा झाल्याचे बोलले जात आहे.
चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने या दोन्ही संघात सलामीवीर म्हणून शुबमन गिल याला जागा मिळाली आहे. वनडे संघात कर्णधार रोहित शर्मा, गिल व ईशान किशन हे सलामीचे पर्याय आहेत. तसेच, केएल राहुल याने देखील मोठा काळ सलामीवीर म्हणून संघाला सेवा दिली आहे. मात्र, या सर्व युवा खेळाडूंच्या गर्दीत शिखर धवन हा आपली जागा वाचवण्यात अपयशी ठरला.
गिलने मागील सहा महिन्यात शानदार कामगिरी करत वनडे संघातील आपली जागा पक्की केली आहे. तर, किशन याने नुकत्याच झालेल्या बांगलादेश दौऱ्यातील अखेरच्या वनडेत विश्वविक्रमी द्विशतकी खेळी केली. केएल राहुल याने मागील दौऱ्यापासून मध्य फळीत चांगले योगदान दिले आहे.
शिखर धवन हा नोव्हेंबर महिन्यात झालेल्या न्यूझीलंड दौऱ्यावेळी वनडे संघाचा कर्णधार होता. मात्र, फलंदाज म्हणून त्या दौऱ्यात तसेच बांगलादेश दौऱ्यात तो आपली छाप पाडण्यात अयशस्वी ठरला. या दोन्ही मालिकांमध्ये तो एकही अर्धशतक झळकावू शकला नव्हता. धवन सध्या 37 वर्षांचा आहे. त्यामुळे आता भविष्यात त्याला संघात जागा मिळण्याची शक्यता अत्यंत धूसर झाल्याचे बोलले जातेय. धवन 2018 मध्येच आपला अखेरचा कसोटी तर 2021 मध्ये शेवटचा टी20 सामना खेळला आहे.
(Shikhar Dhawan Dropped From ODI Team Against Srilanka Might Be End Of Carrier)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कॅमेरून ग्रीन दुखापतीमुळे 5 महिने क्रिकेटपासून दूर? मुंबईचे 17 कोटी पाण्यात
“सनरायझर्स हैदराबाद खेळाडूंना योग्य वागणूक देत नाही”, माजी खेळाडूचा सनसनाटी आरोप