पाकिस्तानचे आजी-माजी क्रिकेटपटू नेहमीच भारताविषयी वक्तव्य करून चर्चेत येत असतात. कधी गरळ ओकतात, तर कधी भारताची प्रशंसा करतात. असेच काहीसे पुन्हा एकदा झाले आहे. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याने भारतीय क्रिकेटबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. त्याने म्हटले आहे की, त्याने नेहमीच पाकिस्तान संघाच्या भारत दौऱ्याचे समर्थन केले आहे. तो म्हणाला, “पहिल्या दिवसापासून मी म्हणत आहे की, पाकिस्तानला भारतात वनडे विश्वचषक खेळण्यासाठी गेले पाहिजे. कारण भारताच्या पैशावरच आपले क्रिकेट पुढे जात आहे.”
शुक्रवारी (दि. 18 ऑगस्ट) माध्यमांशी बोलताना शोएब अख्तर (Shoaib Akhtar) याने मोठे भाष्य केले. तो म्हणाला की, “पाकिस्तानने कधीही भारत दौरा न करण्याचा प्रश्नच नव्हता. आम्हाला सत्याचा सामना करावा लागेल. जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात जास्त पैसा भारतातून येतो आणि आयसीसी त्याच पैशांचा वापर करते.”
“हाच पैसा पाकिस्तानला दिला जातो, ज्याने आमचे देशांतर्गत क्रिकेट पुढे जाण्यास मदत मिळते. त्यामुळे सरळ शब्दात सांगायचं झालं, तर हा भारताचाच पैसा आहे, ज्यावर पाकिस्तानचे क्रिकेट चालते. त्यामुळे पाकिस्तानने भारताचा दौरा न करण्याचे कोणतेही कारण नाही,” असेही पुढे बोलताना अख्तर म्हणाला.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबाबत
विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) सामन्याविषयी बोलताना अख्तर म्हणाला की, “या सामन्याचा सर्व दबाव भारतीय संघावर असेल. कारण, पाकिस्तानकडे गमावण्यासाठी काहीच नाहीये.”
विराट कोहली (Virat Kohli) याच्याविषयी बोलताना तो म्हणाला की, “विराटला आता कसोटी क्रिकेटवर लक्ष द्यावे लागेल आणि सचिन तेंडुलकरच्या 100 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाची बरोबरी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला वाटते की, विराट आणखी सहा वर्षे खेळू शकतो. विश्वचषकानंतर त्याने फक्त कसोटी क्रिकेट खेळले पाहिजे.”
विराटने तिन्ही क्रिकेट प्रकारात खेळावे
भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली (Sourav Ganguly) याने विराटबाबत अख्तरच्या विधानावर म्हटले की, “विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने कोणताही क्रिकेट प्रकार सोडला नाही पाहिजे. विराटने तिन्ही प्रकारात खेळले पाहिजे, ज्या क्रिकेट प्रकारात विराटला खेळावे वाटेल, तो ते खेळऊ शकतो. कारण तो प्रदर्शन करतो.”
अशात अख्तरच्या भारतातून येणाऱ्या पैशांबाबतचे वक्तव्य सध्या देशभरात चर्चेत आहे. तसेच, त्याने आणि गांगुलीने विराटविषयी केलेले विधानही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मात्र, विराट सर्व क्रिकेट प्रकारात खेळण्याबाबत काय निर्णय घेतो, हे येणारा काळच सांगेल. (shoaib akhtar shocking statement says pakistan cricket is running beacause of indian money)
महत्त्वाच्या बातम्या-
कारकिर्दीची सुरुवात अप्रतिम करणाऱ्या तिलकच्या नावावर नकोसा विक्रम, ‘या’ यादीत जोडले गेले नाव
रिंकूबाबत KBCमध्ये विचारला गेला 6.40 लाख रुपयांचा प्रश्न, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांना माहितीये उत्तर