जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी घटनेनंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) पाकिस्तानशी क्रिकेट संबंध पूर्णपणे संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. या दहशतवादी हल्ल्यात 26 हून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले. सौरव गांगुलीने पाकिस्तानला त्यांच्याच भाषेत उत्तर देण्याचे म्हटले आहे.
दोन्ही देशांमधील तणावपूर्ण राजकीय संबंधांमुळे भारताने 2008 पासून पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. दोन्ही देशांनी 2012-13 मध्ये भारतात शेवटची द्विपक्षीय मालिका खेळली होती. अलीकडेच, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy 2024) दरम्यान, भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला आणि त्यानंतर हायब्रिड मॉडेल अंतर्गत सामने खेळवले गेले आणि भारताने त्यांचे सामने दुबईमध्ये खेळले.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना, सौरव गांगुली यांना पाकिस्तानशी क्रिकेट संबंध तोडण्याबद्दल विचारले असता ते म्हणाले, “100 टक्के, पाकिस्तानशी संबंध तोडले पाहिजेत, कठोर कारवाई आवश्यक आहे, दरवर्षी अशा गोष्टी घडतात हे विनोद नाही, दहशतवाद सहन केला जाऊ शकत नाही.”
#PahalgamTerroristAttack | Kolkata, West Bengal: Former Indian cricket team captain Sourav Ganguly says, "100 per cent, this (breaking ties with Pakistan) should be done. Strict action is necessary. It is no joke that such things happen every year. Terrorism cannot be tolerated." pic.twitter.com/J4v4HX3TZJ
— ANI (@ANI) April 25, 2025
गेल्या काही वर्षांत, भारत आणि पाकिस्तान फक्त आशियाई क्रिकेट परिषदेने (ACC) आयोजित केलेल्या टी20 आणि 50 ओव्हर वर्ल्ड कप, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि आशिया कप स्पर्धांमध्येच आमने-सामने आले आहेत. अहवालानुसार, या घटनेनंतर, अशी अपेक्षा आहे की भारत आणि पाकिस्तान आयसीसी स्पर्धांमध्ये एकाच गटात नसतील, पण याबाबत कोणतीही अधिकृत माहिती आली नाही.
सौरव गांगुलीची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्द-
कसोटी-
सामने: 113
धावा: 7,212
स्ट्राइक रेट: 51.25
अर्धशतकं: 35
शतकं: 16
सर्वोत्तम धावा: 239
फलंदाजी सरासरी: 42.17
वनडे-
सामने: 311
धावा: 11,363
स्ट्राइक रेट: 73.70
अर्धशतकं: 72
शतकं: 22
सर्वोत्तम धावा: 183
फलंदाजी सरासरी: 41.02