कोरोना व्हायरसमुळे आयपीएल २०२०चा १३ वा हंगाम अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले आहे. यावर्षी २९ मार्चपासून या लीगची सुरुवात होणार होती. आयपीएल हा बीसीसीआयच्या कमाईचा खूप मोठे स्त्रोत आहे. यावर्षी आयपीएलचे आयोजन न झाल्यामुळे बीसीसीआयच्या तिजोरीला फटका बसू शकतो.
बीसीसीआयचा (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुलीचे (Sourav Ganguly) असे मत आहे की, यावर्षी जर आयपीएलचे आयोजन झाले नाही, तर याचा परिणाम खेळाडूंच्या पगारावर होऊ शकतो.
मिड डेशी बोलताना गांंगुलीने म्हटले की, “आम्हाला आमच्याकडे किती पैसे आहे हे पहावे लागेल तसेच त्या हिशोबाने निर्णय घ्यावा लागेल. जर आयपीएलचे (IPL) आयोजन झाले नाही, तर आम्हाला ४००० कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते जी खूप मोठी रक्कम आहे. जर आयपीएलचे आयोजन झाले, तर खेळाडूंच्या पगारामध्ये कपात करण्याची आवश्यकता नाही.”
बीसीसीआय वार्षिक करारात असणाऱ्या अ+ श्रेणीतील खेळाडूंना दरवर्षी ७ कोटी रुपये देते. तसेच अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी रुपये दिले जातात.
अ+ श्रेणीमध्ये विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराहचा समावेश आहे. त्यामुळे त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
आयपीएलचे आयोजन रद्द करण्याऐवजी मोकळ्या स्टेडिअममध्ये आयोजन करण्याची चर्चा केली जात आहे. याबद्दल बोलताना गांगुली म्हणाला की, “होय, आकर्षण नक्कीच कमी होईल. मला आठवते की, १९९९ला आशियाई चॅम्पियनशीपमध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्याच्या शेवटच्या दिवशी प्रेक्षकांशिवाय खेळण्यास सांंगितले होते.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-एकेवेळी कापायचा क्रिकेट मैदानावरील गवत, आज नावावर आहेत ७१० विकेट्स
-एकाच कसोटी सामन्यात १०० व ० धावा करणारे ५ भारतीय खेळाडू
-६० दिवसांनी कोहली दिसला मैदानावर, व्हिडीओ होतोय जोरदार व्हायरल