क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असतो. येथे कधी, काय होईल याचा अंदाज लावता येत नाही. सध्या भारतामध्ये सुरू असलेल्या आयपीएल २०२२ हंगामातील २१ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात झाला. हैदराबादने फलंदाजी आणि गोलंदाजीतील चांगल्या प्रदर्शनाच्या ८ विकेट्सने हा सामना जिंकला. मात्र त्यांच्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे त्यांच्यावर सामना गमावण्याची वेळ आली असती.
प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात (Gujrat Titans vs Sunrisers Hyderabad) संघाच्या २७ वर्षीय फलंदाज अभिनव मनोहरचे (Abhinav Manohar) हैदराबादच्या क्षेत्ररक्षणांनी चक्क ३ झेल (Abhinav Manohar 3 Catches Dropped) सोडले. विरोधी संघाच्या या लाजिरवाण्या कामगिरीवर स्वत अभिनवलाही हसू आवरले नाही.
तर झाले असे की, गुजरातकडून अभिनव सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. त्याने २१ चेंडू खेळताना १ षटकार आणि ५ चौकारांच्या मदतीने ३५ धावा केल्या. या खेळीदरम्यान त्याला ३ वेळा जीवनदान मिळाले. सर्वप्रथम टी नटराजनच्या डावातील १७.२ षटकात ऍडम मार्करमने लाँग ऑफवर अभिनवचा झेल सोडला. त्यानंतर भुवनेश्वर कुमारच्या १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर पुन्हा लाँग ऑफवर अभिनवचा झेल सुटला. यावेळी हैदराबादच्या राहुल त्रिपाठीने हा झेल सोडला.
https://twitter.com/ckchetanck/status/1513556273379540995?s=20&t=piSVxxtggmEUq0JGXkv7Tw
त्यानंतर याच षटकातील चौथ्या चेंडूवर पुन्हा अभिनवने असा काही फटका मारला की, भुवनेश्वर त्याचा झेल टिपू शकला नाही. परिणामी तिसऱ्यांदा अभिनवला जीवनदान मिळाले. याच चेंडूवर २ धावा काढत अभिनव आणि हार्दिकने त्यांच्यातील ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. तिसऱ्यांदा आपला हा झेल सुटल्याचे पाहून अभिनवला हसू फुटले आणि तो मैदानातच मोठमोठ्या हसू लागला. विशेष म्हणजे, १० चेंडूंमध्ये हैदराबादकडून त्याचे ३ झेल सुटणे ही लाजिरवाणी बाब आहे. मात्र त्यानंतर लगेचच पुढील चेंडूवर (१८.५) भुवनेश्वरने राहुल त्रिपाठीच्या हातून अभिनवला बाद केले.
https://twitter.com/Raj93465898/status/1513550732192260097?s=20&t=upuLtCaco_UusfzsgxWkqw
हैदराबादने रोखला गुजरातचा विजयरथ
दरम्यान सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, गुजरातने कर्णधार हार्दिक पंड्याच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर २० षटकांमध्ये १६२ धावा केल्या. यादरम्यान त्यांनी ७ विकेट्सही गमावल्या. गुजरातच्या या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने चांगला खेळ दाखवला. कर्णधार केन विलियम्सनने ५७ धावांची शानदार खेळी केली. तसेच अभिषेक शर्माने ४२ धावा आणि शेवटी निकोलस पूरनने नाबाद ३४ धावा करत संघाला १९.१ षटकातच सामना जिंकून दिला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
सलग दुसऱ्या विजयानंतर हैदराबादला मोठा धक्का, ‘हा’ स्टार क्रिकेटर २ आठवड्यांसाठी संघातून बाहेर
‘ती’ अविस्मरणीय खेळी, जेव्हा ब्रायन लाराने विरोधकांची पिसे काढत चोपल्या होत्या बिनबाद ४०० धावा
उमरानच्या १४०kphचा चेंडू मारण्याच्या प्रसंगावर हार्दिक म्हणाला, ‘मी अशा गोलंदाजांना असंच जाऊ देणार…’