इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या प्लेऑफच्या सामन्यांना २४ मे पासून सुरूवात होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामना २९ मे रोजी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. दरम्यान, आयपीएलच्या विजेत्याबद्दल अनेक आजी-माजी क्रिकेटपटूंनी आपले अंदाज व्यक्त केले आहेत. आता या हंगामाचा विजेता कोण होऊ शकतो आणि त्याचे कारण काय हे स्पष्ट करत सुरेश रैना याने आश्चर्यकारक विधान केले आहे.
चार वेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा माजी खेळाडू असलेल्या रैनाने आरसीबीने (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर) हा आयपीएल हंगाम जिंकावा, असे म्हटले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू आणि दिर्घकाळ सीएसकेकडून खेळणाऱ्या रैनाने स्टार स्पोर्टशी संवाद साधताना तो म्हणाला, “यंदाचा आयपीएल हंगाम आरसीबीने जिंकावा असे मला मनोमन वाटत आहे. कारण विराट कोहली हे त्याचे मुख्य कारण आहे.”
यंदा फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या आरसीबीने रखडत रखडत प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. तर त्यांना विजेतेपद मिळवण्यासाठी पुढील तीन सामने जिंकणे आवश्यक आहे. यासाठी त्यांना पहिल्या इलिमिनेटर सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला पराभूत करावे लागेल. हा सामना २५मे रोजी इ़डन गार्डन, कोलकाता येथे खेळला जाणार आहे. यानंतर त्यांना २७ मे रोजी होणाऱ्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाशी दोन हात करावे लागणार आहे. नंतर अंतिम सामना जिंकावा लागेल.
आयपीएलच्या या पंधराव्या हंगामात आरसीबीने १४ पैकी ८ सामने जिंकले आहेत. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (२१ मे, 2022) यांच्यात झालेल्या सामन्याच्या निकालाने आरसीबीचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले. या सामन्यात मुंबईने दिल्लीला ५ विकेट्सने पराभूत केले होते. यावेळी मुंबईने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण निवडले होते. तर 160 धावांच्या लक्षाचा पाठलाग करताना टीम डेविड याने ताबडतोब फलंदाजी करत ११ चेंडूमध्ये ३४ धावा केल्या होत्या.
महत्वाच्या बातम्या-
‘या आयपीएल हंगामात आम्ही सातत्याने…’, पंजाबच्या अपयशानंतर कर्णधार मयांकची प्रामाणिक कबुली
टीम बसमध्ये असताना अर्शदीपला मिळाली भारतीय संघातील निवडीची बातमी, खुद्द केला खुलासा
फॉर्मात असलेल्या पुजाराचे टीम इंडियात पुनरागमन; प्रतिक्रिया देताना म्हणाला, ‘माझी निवड झाल्याचा..’