---Advertisement---

बांगलादेश बनला टॉसचा बॉस! टीम इंडियाला फलंदाजीचे आमंत्रण; संघात महत्त्वपूर्ण बदल

shakib-rohit-
---Advertisement---

भारतीय संघ बुधवारी (2 नोव्हेंबर) टी-20 विश्वचषक 2022 मधील चौथा सामना बांगलादेशविरुद्ध खेळत आहे. भारताने त्याच्या पहिल्या तीन सामन्यांपैकी पहिले दोन सामने जिंकले आहेत, तर रविवारी (30 ऑक्टोबर) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळलेल्या तिसऱ्या सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागाला. आता उपांत्य सामन्यापर्यंत पोहोचण्यासाठी भारतीय संघाला बांगलादेशविरुद्धचा सामना जिंकणे महत्वाचे असेल. अशा या महत्वाच्या लढतीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

भभारतीय संघाचा या सामन्यात एक महत्वाचा बदल पाहायला मिळाला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात अष्टपैलू दीपक हुड्डा () याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली होती. मात्र, हुड्डाला अपेक्षित प्रदर्शन करता आले नाही. याच कारणास्तव बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात हुड्डाच्या जागी अक्षर पटेलला निवडले गेले. अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले होते. कार्तिकच्या जागी पंत या सामन्यात खेळेल, असा अनेकांचा अंदाज होता, पण तसे होताना दिसले नाही. कार्तिकला पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडले गेले आहे.

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारतीय संघ – रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, अर्शदीप सिंग, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

बांगालदेश संघ – शाकिब अल हसन (कर्णधार), नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, अफिफ हुसेन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, नुरुल हसन, हसन महमूद, तस्किन अहमद, शरीफूल इस्लान, मुस्तफिजुर रहमान.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्यामुळे’ केएल राहुल करत नाहीये चांगले प्रदर्शन, भारताच्या माजी कर्णधारांची मोठी प्रतिक्रिया
पावसामुळे भारत विरुद्ध बांगलादेश सामन्यात येणार बाधा! हवामान अंदाज पाहून चाहत्यांचीही वाढली चिंता  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---