भारतीय संघाला 1983 मध्ये पहिला आयसीसी विश्वचषक जिंकवून देणारे कर्णधार कपिल देव यांनी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सुधार सुचवला आहे. कपिल यांच्या मते सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकात दिनेश कार्तिकच्या जागी रिषभ पंत याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली गेली पाहिजे. असे असले तरी भारतीय संघाने रविवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात देखील पंतला प्लेइंग इलेव्हनमधून वगळले.
रिषभ पंत टी-20 विश्वचषकासाठी निवडलेल्या भारताच्या 15 सदस्यीय संघाचा भाग आहे. परंतु भारताच्या पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्याला प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवले गेले. याच पार्श्वभूमीवर भारताचे माजी दिग्गज कर्णधार कपिल देव (Kapil Dev) यांनी पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याचा सल्ला दिला आहे. विश्वचषकातील पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये पंत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर असला, तरी हे दोन्ही सामने भारताने जिंकले आहेत. संघ सध्या सुपर 12 फेरीच्या ग्रुप दोनमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. रविवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात देखील पंतला खेळण्याची संधी दिली गेली नाही.
भारतीय संघाला रिषभ पंतची गरज – कपिल देव
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यापूर्वी बोलताना कपिल देव म्हणाले की, ” मला एवढेच म्हणायचे आहे की, आपल्याकडे रिषभ पंत (Rishabh Pant) आहे. संघाला सध्या त्याची गरज आहे. दिनेश कार्तिक देखील संघात आहे, पण यष्टीरक्षणाचा विचार करता, पंत आल्यानंतरच संघ पूर्ण होईल.”
कपिल पुढे बोलताना म्हणाले की, “रिषभ पंत एक चांगला क्रिकेटपटू आहे. तुम्ही जर त्याची फलंदाजी पाहिली तर, तो जास्त संघर्ष करताना दिसत नाही. माझी इच्छा आहे की, त्याने संघासाठी धावा कराव्यात अशी माझी इच्छा आहे. कारण धावा करणे त्याच्यासाठी देखील गरजेचे आहे. काही खेलाडूंना असे सांगितले जाते की खूप वेगात खेळू नका. पंत देखील सुरुवातीला त्याचा वेळ घेऊ शकतो, जेणेकरून नंतर जेव्हा गरज असेल, तेव्हा वेगाने धावाही करता येतील.”
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
पाकिस्तान संघ जिंकला, तरीही ‘या’ बाबतीत बाबर विराटच्या खालीच; स्वत:च ठरलाय कारणीभूत
विश्वचषकात बाबरचा उठलाय बाजार! तिन्ही सामन्यात विरोधी गोलंदाजांनी केलीय स्वस्तात शिकार