भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर बुधवारी (१ जून) लग्नबंधनात अडकला. त्याची प्रेयसी जया भारद्वाजसोबत त्याने आग्रा याठिकाणी लग्नगाठ बांधली. दीपकची बहीण मालती चाहरमुळे त्याची जयासोबत ओळख झाली होती आणि पुढे त्यांचे संबंध प्रेमात बदलले. आता मालतीने दीपकला त्याच्या हनीमूनपूर्वी एक सल्ला दिला आहे, जो सोशल मीडियावर चर्चेचा विषय देखील ठरला आहे.
दीपक चाहर (Deepak Chahar) आणि जया भारद्वाज (Jaya Bhardwaj) यांच्यातील प्रेमसंबंध मागच्या वर्षी आयपीएल सुरू असताना सर्वांसमोर आले. चेन्नई सुपर किंग्जसाठी खेळणाऱ्या दीपकने साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात जयाला लग्नासाठी विचारले होते आणि तिने देखील सर्वांसमोर त्याला होकार दिला होता. लग्नानंतर दीपक चाहर जयासोबत हनीमूनवर जाण्याच्या तयारीत आहे. मात्र, अशातच त्याची बहीण मालती चाहर (Malti Chahar) हिने त्याला एक महत्वाची बाब लक्षात आणून दिली आहे.
राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये असताना दीपकच्या कंबरेला दुखापत झाली आहे आणि आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी त्याला या दुखापतीतून सावरणे गरजेचे आहे. हनीमूनवर जाण्याआधी मालतीने हीच बाब दीपकला लक्षात आणून दिली आहे. तिची इच्छा आहे की, पत्नीसोबत हनीमूनवर गेल्यानंतर त्याने स्वतःच्या पाठीची काळजी घेतली पाहिजे.
मालतीने तिच्या ट्विटर खात्यावरून पोस्ट करून दीपकला हा सल्ला दिला आहे. पोस्टच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, “आता मुलगी आमची झाली आहे… तुम्हाला वैवाहिक जीवनाच्या खूप खूप शुभेच्छा. कृपया हनीमूनदरम्यान तुझ्या पाठीची काळजी घे. आपल्याला आगमी काळात विश्वचषक खेळायचा आहे.” मालतीच्या या मजेशीर पोस्टनंतर चाहत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.
Ab ladki hui humari….Wish you guys a very happy married life🧿 @deepak_chahar9 please take care of your back during your honeymoon..we have World Cup ahead 😜#family #brother #marriage #siblings pic.twitter.com/Hm2unculO7
— Malti Chahar🇮🇳 (@ChaharMalti) June 3, 2022
आयपीएल २०२१मध्ये सीएसकेसाठी दीपक चाहर हा एक महत्वाचा गोलंदाज ठरला होता. त्यानंतर त्याने अनेक सामन्यांमध्ये भारतीय संघासाठी देखील महत्वाचे प्रदर्शन केले. याच पार्श्वभूमीवर आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात सीएसकेने दीपकला पुन्हा संघात घेण्यासाठी तब्बल १४ कोटी खर्च केले, पण त्यानंतर मेगा लिलावानंतर खेळल्या गेलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत त्याच्या पायाला दुखापत झाली आणि तो संपूर्ण आयपीएल हंगामातून बाहेर पडला.
आयपीएल हंगामातून बाहेर पडल्यानंतर दीपक दुखापतीवर काम करण्यासाठी बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमी म्हणजेच एनसीएमध्ये गेला. त्याठिकाणी काही दिवस घालवल्यानंतर त्याला अजून एक दुखापत झाली. यावेळी दीपकच्या कंबरेला दुखापत झाली, जी खूपच गंभीर सांगितली गेली. वृत्तानुसार, दीपक या दुखापतीनंतर ५ ते ६ महिने खेळू शकणार नाहीये. याचाच अर्थ असा की, तो फक्त आयपीएल नाही, तर आगामी टी-२० विश्वचषकाला देखील मुकू शकतो.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये करोडोंची बोली लागल्यानंतर खरंच तेवढे पैसे खेळाडूंच्या खात्यात जमा होतात का?
तोडीस तोड! दक्षिण आफ्रिकेचे ‘हे’ ४ गोलंदाज भारताच्या फलंदाजांवर पडू शकतात भारी, एकाने गाजवलीय आयपीएल
IPL फायनलसाठी उगाचच नव्हते निवडले नरेंद्र मोदी स्टेडियम, सोयी-सुविधांनी आहे परिपूर्ण