यंदाच्या टी20 विश्वचषकापर्यंत राहुल द्रविड भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. ही स्पर्धा संपल्याने राहुल द्रविडचा कार्यकाळही संपला. आता टीम इंडियाला नवे हेड कोच मिळणार आहे. द्रविडचा टीम इंडियासोबतचा प्रवास विजयी प्रशिक्षक म्हणून संपला. संघाला अलविदा करण्यापूर्वी द्रविडने ड्रेसिंग रुममध्ये अंतिम भाषण केले. तर मग जाणून घेऊया द्रविड त्याच्या शेवटच्या भाषणात काय म्हणाला होता.
टीम इंडिया विश्वविजेता बनल्यानंतर राहुल द्रविड ड्रेसिंग रुममध्ये म्हणाला, “मला या अद्भुत आठवणीचा एक भाग बनवल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार. तुम्ही तुमच्या आयुष्यात किती धावा केल्या किती विकेट घेतल्या हे विसरताल पण हा जो क्षण आहे ते तुम्ही कधीच विसरणार नाही. आपण एक संघ म्हणून ज्या प्रकारे काम केले, जिथे या आधी आम्ही जवळ आलो पण सीमा ओलांडू शकलो नाही. पण या वेळी ज्या प्रकारे सर्वजण लढले हे अविश्वसनीय होते.
तो पुढे म्हणाला, “या मुलांनी काय केले, तुम्ही सर्वांनी काय केले, सपोर्ट स्टाफने काय केले, आपण केलेले कठोर परिश्रम, आम्ही केलेला त्याग. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे आणि तुम्ही जे काही साध्य केले आणि मला वाटते की प्रत्येकाला तुमचा त्यांच्या कुटुंबियांना या ठिकाणी आनंद लुटताना पाहण्यासाठी खूप त्याग केले आहेत.
द्रविड पुढे म्हणाला, “आपल्या सर्वांचे आभार. माझ्याकडे शब्दांची कमतरता आहे, जे सहसा घडत नाही. मी त्याचा एक भाग होण्यापेक्षा जास्त कृतज्ञ होऊ शकत नाही. माझ्याबद्दल आदर, दयाळूपणा आणि प्रयत्न जे तुम्ही सर्वांनी माझ्यासाठी ठेवले आहे.” आणि माझ्या कोचिंग स्टाफचे खूप आभार.
2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर, राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षकपदावरून पायउतार व्हायचे होते, परंतु रोहित शर्माने त्याला राहण्यासाठी राजी केले. द्रविडने पुढे रोहित शर्माचे आभार मानले आणि म्हणाला, “रोहित, नोव्हेंबरमध्ये कॉल केल्याबद्दल आणि मला राहण्यास सांगितल्याबद्दल धन्यवाद.
???????????? ???????????????????????????????????????????????????? ????????????????-????????????????! ????
The sacrifices, the commitment, the comeback ????
????️ #TeamIndia Head Coach Rahul Dravid’s emotional dressing room speech in Barbados ???????? #T20WorldCup pic.twitter.com/vVUMfTZWbc
— BCCI (@BCCI) July 2, 2024
महत्तवाच्या बातम्या-
“या संघाचा हिस्सा असल्याचा…” पीएम मोदींना बोलताना विराटच्या भावना समोर
लागा तयारीला! या दिवशी टीम इंडिया भारतात पोहोचणार, बीसीसीआयनं केली खास विमानाची व्यवस्था
फक्त ‘त्या’ खेळाडूने कॉल केला नसता तर द्रविड कोच राहिला नसता…






