इंग्लंड विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघ गुरूवारी (२३ जून) लिसेस्टरशायर विरुद्ध सराव सामना खेळत आहे. चार दिवसाच्या या सामन्यात भारताचे चार खेळाडू लिसेस्टरशायरकडून खेळत आहेत. यावेळी भारताच्या फलंदाजांसमोर भारतीय गोलंदाज हे दृश्य पाहण्यास मिळाले. भारत आणि मुंबई इंडियन्स संघाचे दोन दिग्गज खेळाडू आमने-सामने आले होते. त्यांची टक्कर पाहण्यास चाहते चांगलेच उत्सुक झाले. रोहित शर्मा (Rohit Sharma) भारताचे तर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लिसेस्टरशायरचे प्रतिनिधित्व करत आहेत.
हा सराव सामना झाल्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध एजबस्टन, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहेत. या सराव सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तो फलंदाजी करत असताना सहाव्या षटकात गोलंदाजीसाठी बुमराह समोर आला. बुमराहने या षटकात दुसरा चेंडू जलद गतीने टाकला असता रोहितने पुढे येऊन तो खेळण्याचा प्रयत्न केला. तेव्हाच चेंडू रोहितला लागला, त्याचा प्रघात मोठा असल्याने तो जमिनीवर बसला. त्यानंतर फिजिओला पण बोलावण्यात आले. पुढे त्याने फलंदाजी सुरूच ठेवली, मात्र तरीही त्याची ही दुखापत गंभीर असेल तर भारतासाठी चिंतेची बाब ठरणार आहे.
https://twitter.com/VK__Goat18_/status/1539910430952685568?s=20&t=FSPDYHcE7poIAtxo1nyFug
या सामन्यात रोहित आणि शुबमन गिलने सलामीला येत चांगली सुरूवात करण्याचा प्रयत्न केला. मात्र रोमन वॉकर (Roman Walker) याने भारताचा अर्धा संघ तंबूत पाठवला. त्याने पहिल्या दिवसाखेर वॉकरने ११ षटके टाकत २४ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. यावेळी भारताने ८ विकेट्स गमावत २४६ धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक-फलंदाज केएस भरतने उत्तम फलंदाजी केली आहे. पहिल्या दिवसाचा खेळ संपला असता तो ७० धावा आणि मोहम्मद शमी १८ धावा करत खेळपट्टीवर टिकून आहेत.
लिसेस्टकशायरकडून या सामन्यात बुमराहबरोबर चेतेश्वर पुजारा, यष्टीरक्षक रिषभ पंत आणि प्रसिद्ध कृष्णा हे खेळत आहेत. कृष्णाने श्रेयस अय्यरला शून्यावरच बाद करत पहिली विकेट मिळवली. बुमराहने भेदक गोलंदाजी केली, पण तरीही त्याला एकही विकेट मिळाली नाही.
हा सराव सामना संपल्यावर भारत १ जुलैला इंग्लड विरुद्ध एजबस्टन ग्राउंड, बर्मिंघम येथे कसोटी सामना खेळणार आहेत. हा सामना मागील वर्षाच्या पाच कसोटी मालिकेतील शेवटचा सामना आहे. कोरोनामुळे भारतीय संघ अर्ध्यातच मालिका सोडून मायदेशी परतला होता. या मालिकेत भारत २-१ असा आघाडीवर आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सराव सामन्यातही वाद, पंचांनी चुकीच्या पद्धतीने आऊट दिल्यानंतर संतापला विराट; मैदानातच विचारला जाब
एकाही प्रथम श्रेणीचा अनुभव नसलेल्या गोलंदाजाने उडवल्या रोहित-विराटच्या दांड्या, पण कोण आहे हा भिडू?