भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाचवा कसोटी सामान रविवारी (3 डिसेंबर) खेळला गेला. बेंगलोरच्या एम चिदंबरम आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी पराभव केला. 161 धावांचे लक्ष गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रलिया संघ 154 धावा करू शकला. भारताने या सामन्यात मोठी धावसंख्या उभारली नाही, असे वाटत होते. पण गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत सामना जिंकवला.
ऑस्ट्रेलियाला विजयासाठी शेवटच्या षटकात 10 धावांची गरज होती. गोलंदाजीला आलेल्या अर्शदिप सिंग याने 6 चेंडूत 10 धावा खर्च केल्या आणि भारतीय संघ जिंकला. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्यात एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. कर्णधार मॅथ्यू बेड याने 22 धावांची खेळी केली. पण एकटा कर्णधार संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकुण प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊन भारतीय संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. 20 षटकांच्या सामन्यात भारताने 8 विकेट्स गमावून 160 धावा केल्या. यात सर्वोत्तम खेळी श्रेयस अय्यर याने केली. श्रेयसने 37 चेंडूत 53 धावा केल्या. तर जितेश शर्मा यानेही 24 धावांचे योगदान दिले. अष्टपैलू अक्षर पटेल याने 31, सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वाल 21, तर ऋतुराज गायकवाड 10 धावांची खेळी करून बाद झाले.
गोलंदाजी विभागातून ऑस्ट्रेलियासाठी बेन द्वारशुइस आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या. ऍरॉन हार्डी, नेथन एलिस आणि तनविर संघा यांनी प्रत्येकी एक-एक विकेट्स घेतल्या. भारतीय संघासाठी मुकेश कुमार याने 3 विकेट्स घेतल्या. तर रवी बिश्नोई याने 4 षटकात 29 धावा खर्च करून 2 विकेट घेतल्या. तर अक्षर पटेल याने 4 षटकांमध्ये अवघ्या 14 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट्स घेतली. (The batsmen caught, the bowlers stopped! Surya’s team won by 6 runs in the last match, pocketing the series 4-1)
महत्वाच्या बातम्या
PKL 2023: नवीनचा सुपर 10 व्यर्थ, Dabang Delhiचा दारुण पराभव; Thalaivasच्या उपकर्णधाराने मिळवले 21 पॉईंट्स
काय राव! रिंकूच्या टी20 कारकीर्दीत ‘असं’ पहिल्यांदाच घडलं; वाचून तुम्हीही म्हणाल, ‘हे नव्हतं व्हायला पाहिजे’