तुम्ही जर क्रिकेटचे 80-90च्या दशकांतील क्रिकेटप्रेमी असाल, तर तुम्ही कसोटी क्रिकेटप्रमाणे वनडे आणि टी20 क्रिकेटमध्ये पांढरे कपडे घालून लाल चेंडूने क्रिकेट खेळताना पूर्वी कधी पाहिले नसणार. मात्र, क्रिकेटला या आधुनिक रुपात 43 वर्षांपूर्वी म्हणजेच 1977मध्ये एका बंडखोर सीरिजच्या माध्यमातून पाहायला मिळाले होते. त्या सीरिजला क्रिकटचे सर्वोत्कृष्ट समालोचक जॉन आर्लोट यांनी ‘सर्कस’ असे नाव दिले होते.
ही बंडमोर सीरिज म्हणजे कॅरी पॅकर्स यांची “वर्ल्ड सीरिज.” या वर्ल्ड सीरिज क्रिकेटची ओळख जगाला आजच्या दिवशी म्हणजे 9 मेला डेली मेल वृत्तपात्राच्या ‘टर्नड पायरेट्स’ या शीर्षकाच्या रुपात झाली होती. या सीरिज क्रिकेटने जगातील सर्व क्रिकेट बोर्डांना चिंतेत पाडले होते.
जाणून घेऊया, नक्की या सीरिजमुळे जगातील सर्व क्रिकेट बोर्ड चिंताग्रस्त का झाले होते?
विशेष म्हणजे या वर्ल्ड सीरिजचा उदय हा बदल्याच्या भावनेतून झाला होता. पॅकर्स हे ऑस्ट्रेलियातील सर्वात मोठे टिव्ही चॅनल ‘चॅनल-9’चे मालक होते. त्यामुळे त्यांनी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाकडून त्यांचे कसोटी सामने लाईव्ह दाखवण्याचा अधिकार देण्याची विनंती केली होती, पण बोर्डाने त्यांना नकार दिला. म्हणून पॅकर्सनी त्यांचे स्वत:चे क्रिकेट चालू करण्याचा निर्णय घेतला आणि वर्ल्ड सीरिज क्रिकेट या नावाने आपल्या क्रिकेटची सुरुवात केली.
पॅकर्स यांनी आपल्या क्रिकेटला रोमांचक बनवण्यासाठी क्रिकेटचे सामने रात्री लाईटच्या लख्ख प्रकाशात घेण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्यांच्यापुढे सर्वात मोठी समस्या होती, ती क्रिकेट स्टेडियममध्ये फ्लड लाईट्स नसल्याची. अशात पॅकर्स यांनी फुटबॉल स्टेडियम भाड्याने घेतले आणि त्यावर कृत्रिम खेळपट्टी तयार करत त्यांनी सामने घेण्यास सुरुवात केली.
असे पहिल्यांदाच होत होते की, क्रिकेटर्स रात्रीच्या कृत्रिम प्रकाशात क्रिकेट खेळत होते. त्यानुसार पॅकर्सनी क्रिकेटसाठी लाल चेंडू आणि रंगीत कपड्यांचा वापर केला होता.
पॅकर्स यांनी त्यांच्या वर्ल्ड सीरिजमध्ये दिग्गज क्रिकेटपटूंचा समावेश करण्यासाठी इंग्लंडचे माजी कर्णधार टोनी ग्रेग यांना आपल्यासोबत जोडले. तसेच, त्यांच्यांवर दिग्गज क्रिकेटपटूंना आणण्याची जबाबदारी सोपवली. त्यावेळी ग्रेग यांनी जवळपास जगातील सर्व दिग्गज क्रिकेटपटूंना मोठी रक्कम देत वर्ल्ड सीरिज क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार केले आणि त्यांच्याशी करार केला की, ते आपापल्या देशाकडून क्रिकेट खेळणार नाहीत.
याचा अर्थ असा होतो की, त्यांनी जगभरातील दिग्गज क्रिकेटपटूंना त्यांच्याच देशाविरुद्ध बंडखोरी करण्यास मजबूर केले होते.
पॅकर्स यांच्या दिवसरात्र क्रिकेटला त्यावेळी प्रेक्षकांनी इतका प्रतिसाद दिला होता की, फुटबॉल स्टेडियमच्या बाहेर तिकिटांसाठी प्रेक्षकांची खूप गर्दी व्हायची. तसेच, टीव्हीवरती सर्वाधिक प्रमाणात या क्रिकेटचे सामने पाहिले जात होते. यामुळे सर्व देशांचे क्रिकेट बोर्ड चिंताग्रस्त झाले होते आणि ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाला कसोटी सामने दाखवण्याचा अधिकार देण्याची मागणी करत होते. तेव्हापर्यंत विश्व मालिका क्रिकेटचे जवळपास 17च सामने झाले होते.
पॅकर्सनी त्यांची ही मागणी पूर्ण झाल्यानंतर वर्ल्ड सीरिज बंद केली आणि सर्व क्रिकेटपटूंची त्यांच्या करारातून सुटका केली. जरी, ती मालिका 17 सामन्यांवर संपली असेल, तरी त्यानंतर सर्व देशांनी दिवस-रात्र क्रिकेटला प्राधान्य दिले. तिथून ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी दिवस-रात्र तिरंगी मालिकेची सुरुवात झाली.
काही वृत्तांनुसार, तेव्हाचे महान खेळाडू सुनील गावसकर (Sunil Gavaskar) हे देखील यात सीरिजमध्ये खेळण्यासाठी इच्छुक होते, तर बिशन सिंग बेदी यांच्या मते, ते खेळाडूंला विकत घेणे वगैरे चुकीच्या गोष्टी समजत होते. या सीरिजमध्ये वेगवेगळ्या कारणांमुळे कुणीही भारतीय खेळाडू खेळला नाही. (The beginning of kerry packer circus world series cricket)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
“गंभीरने वादात पडायला नको होते”, ‘त्या’ घटनेवर दिग्गजाची प्रतिक्रिया
‘तर आरसीबीने 3 आयपीएल ट्रॉफी जिंकल्या असत्या’, पाकिस्तानी दिग्गजाचे वक्तव्य