यंदाच्या टी20 विश्वचषकातील भारतविरुद्ध कॅनडा सामना ओल्या मैदानामुळे रद्द करण्यात आला. यादरम्यान सामन्याचे 1-1 गूण दोन्ही संघात वाटून देण्यात आले. भारतीय संघ ‘अ’ गटाच्या गूणतालिकेत 7 गूणांसह अव्वल स्थानी आहे. या गटामध्ये भारतीय संघासह यजमान अमेरिका संघ सुपर-8 साठी पात्र ठरले आहे. तर पाकिस्तान, आयर्लंड आणि कॅनडा विश्वचषकातून बाहेर पडणारे संघ आहेत. अश्या स्थितीत भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर येत आहे. कारण 2007 मधील संयोग 17 वर्षानंतर 2004 च्या भारता सोबत घडला आहे.
एमएस धोनीच्या नेत्तृतवाखाली भारतीय संघाने 2007 साली विश्वचषकाच्या पहिल्या आवृत्ती मध्येच टी20 विश्वविजेता बनला होता. मागील 17 वर्षापासून टीम इंडिया आपल्या दुसऱ्या टी20 ट्राॅफीच्या शोधात आहे. पण 2007 साली झालेला एक योगायोग 2024 मध्ये देखील घडला आहे. 17 वर्षानंतर हा संयोग पहायला मिळाला आहे. 2007 च्या स्पर्धेतही भारताचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. गट फेरीत भारताचा सामना स्कॉटलंडशी होणार होता. मात्र पावसामुळे तो सामना होऊ शकला नाही. आता 17 वर्षांनंतर टी-20 विश्वचषकातील भारताचा हा सामना पावसामुळे रद्द झाला आहे.
भारतीय संघाला आयसीसी स्पर्धेत नाॅक आउट सामन्यात पराभवास सामोरे जावे लागते, 2023 मध्ये एकदिवसीय विश्वचषकच्या फायनलमध्ये तर 2002 साली भारत सेमी फायनल मधून बाहेर पडला होता. 2007 साली भारताने सेमी फायनल मध्ये मजबूत ऑस्ट्रेलियाचा पराभव करुन फायनल मध्ये पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकून विश्वविजेता ठरला होता.
भारतीय संघाने शेवटची आयसीसी स्पर्धा 2013 मध्ये जिंकली होती. त्यावेळी भारत चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता ठरला होता. तेव्हापासून भारताने 5 वेळा अंतिम सामना गमावला आहे. यामध्ये 2014 टी20 विश्वचषक, 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी आणि 2023 एकदिवसीय विश्वचषक तसेच 2021 आणि 2023 कसोटी चॅम्पियनशिपचे विजेतेपद सामने समाविष्ट आहेत. 2015 एकदिवसीय विश्वचषक, 2016 टी20 विश्वचषक, 2019 एकदिवसीय विश्वचषक आणि 2022 टी20 विश्वचषक स्पर्धेतील भारताचा प्रवास उपांत्य फेरीत संपला होता.
महत्तवाच्या बातम्या-
भारताचे दिग्गज फलंदाज अमेरिकेत पूर्णपणे प्लॉप, आकडेवारी पाहून बसेल धक्का!
पावसामुळे सामना रद्द! टीम इंडियाने कॅनडाच्या खेळाडूंसोबत मस्ती करत घालवला वेळ
ऑस्ट्रेलियाच्या विजयासह इंग्लंडला मिळालं सुपर 8 चं तिकीट, आतापर्यंत 7 संघ पात्र