आगामी टी२० विश्वचषक यूएई आणि ओमानमध्ये खेळला जाणार आहे. विश्वचषकाला सुरुवात १७ ऑक्टोंबरपासून होणार आहे. तत्पूर्वी या विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा लवकरच होणार आहे. याआधी न्यूझीलँड आणि ऑस्ट्रेलिया या दोन संघांनी विश्वचषकासाठी त्यांचे संघ घोषित केले आहेत. असे असले तरीही भारतीय संघाची घोषणा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर होईल असा अंदाज बांधला जात आहे. अशात एका सूत्राने याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
एएनआयनने विश्वसनीय सुत्रांच्या हवाल्याने अशी माहिती दिली आहे की, “आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा पुढच्या आठवड्यात केली जाईल. बोर्ड आधी भारत आणि इंग्लंड यांच्यात ओव्हलवर होणारा कसोटी सामना संपण्याची वाट पाहिल. चौथ्या कसोटीनंतर बीसीसीआय विराट कोहलीच्या नेतृत्वात १५ खेळाडूंचा संघ निवडेल.”
टी२० विश्वचषकासाठी बीसीसीआय १५ सदस्यीय संघाची घोषणा करेल. विश्वचषकाच्या मुख्य संघासोबत अतिरिक्त तीन खेळाडूंचीही नावे घोषित होतील. हे तीन खेळाडू संघात राखीव असतील.
धवन आणि अश्विनला मिळेल का संघात संधी?
विश्वचषकासाठी भारतीय संघात कोणत्या खेळाडूंना संधी मिळते? हे आता सध्या सांगणे कठीण आहे. इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती आणि वाॅशिंगटन सुंदरसारख्या खेळाडूंना या संघात संधी मिळू शकते. भारताचा अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन संघासोबत खेळण्यासाठी इच्छुक असून त्याला संघात स्थान मिळते की नाही? हे पाहावे लागेल.
याव्यतिरिक्त शिखर धवनला संघात संधी मिळण्याविषयीही शंका आहे. कारण भारताकडे आधीच केएल राहुल आणि पृथ्वी शाॅ हे सलामीवीर आहेत. अशात संघात शिखरसाठी जागा शिल्लक नसल्याचेच दिसत आहे. असे असले तरीही, निवडकर्ता धवनला संघात सामील करता की नाही? हे पाहावे लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!
ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi
आयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान