---Advertisement---

भारतीय संघ क्षेत्ररक्षणात मजबूत होणार! भारताच्या फिल्डिंग कोचने आखली नवी योजना

On: शुक्रवार, ऑक्टोबर 4, 2024 11:23 PM
team india
---Advertisement---

भारत विरूद्ध बांगलादेश (India vs Bangladesh) संघात 3 सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. त्यासाठी भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. 3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी दोन्ही संघ (6 ऑक्टोबर) पासून आमने-सामने असणार आहेत. तत्पर्वी भारतीय संघाचे फील्डिंग कोच यानी भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाबद्दल वक्तव्य केले आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये दिलीपला असे म्हणताना ऐकू येत आहे की, “तुम्ही जिथे चेंडू फेकत आहात तिथे तुमचे पाय घ्या. हे इतके सोपे आहे. मी तीव्रतेबद्दल बोलत नाही पण आज आपल्याला लय आणि प्रवाह गाठायचा आहे आणि एकदा आपण ते साध्य करू आणि 15 झेल घेऊ.”

बीसीसीआयने ट्विट केले की, “ग्वाल्हेरमध्ये लयमध्ये आणि पूर्ण उत्साहात तयारी. भारत विरुद्ध बांगलादेश टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाने आपल्या क्षेत्ररक्षण कौशल्याचा गौरव केला.”

टी दिलीप, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय खेळाडूंनी त्यांच्या झेल पकडण्याचा सराव केला. कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) आणि इतर युवा खेळाडूंनी काही उत्कृष्ट झेल घेतले. ग्वाल्हेरमधील पहिल्या सामन्यानंतर पुढील दोन सामने दिल्ली आणि हैदराबादमध्ये खेळले जाणार आहेत.

3 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ- सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रियान पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अर्शदीप सिंग, हर्षित राणा आणि मयंक यादव.

महत्त्वाच्या बातम्या-

IND vs BAN; टी20 सामन्यावर धोका! पोलिसांचा कडक बंदोबस्त, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
दक्षिण आफ्रिकेचे ‘हे’ 4 धुरंधर आयपीएल मेगा लिलावापूर्वी होणार रिलीज?
श्रीलंकेच्या संगकाराने भारताच्या ‘या’ खेळाडूला म्हटले जगातील सर्वोत्तम टी20 फिनीशर!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---