चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यानंतर भारतीय क्रिकेट संघात मोठा बदल दिसून येऊ शकतो. एका वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ नेतृत्व बदलण्याचा विचार करत आहे. रोहित शर्मानंतर आता टीम इंडियाची कमान दुसऱ्या कोणाकडे सोपवली जाईल. शुभमन गिल या शर्यतीत आघाडीवर आहे. गिल सध्या टीम इंडियाचा उपकर्णधार देखील आहे.
रोहित शर्माबाबत बीसीसीआय महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकते. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या फायनलनंतर रोहितला कर्णधारपदावरून हटवले जाऊ शकते. जर रोहितने कर्णधारपद सोडले तर शुबमन गिलकडे नेतृत्व सोपवले जाऊ शकते. हार्दिक पंड्या देखील या शर्यतीत बरोबरीने धावत आहे. पंड्या हा एक अनुभवी खेळाडू आहे आणि त्याने कर्णधारपदही सांभाळले आहे. दुसरीकडे गिल अजूनही तरुण आहे आणि बराच काळ संघाला पाठिंबा देऊ शकतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ची सुरुवात 19 फेब्रुवारी पासून झाली. आता या स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (9 मार्च) दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम वरती खेळला जाणार आहे. हा सामना भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात खेळला जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएलची ताकद! पाकिस्तानचा क्रिकेटपटू दुसऱ्या देशाचे नागरिकत्व घेऊन स्पर्धेत सामील होणार
रोहित शर्मा इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, साधणार धोनीच्या या विक्रमाशी बरोबरी!
IND vs NZ Final: नव्या खेळपट्टीवर नाही खेळला जाणार फायनल सामना! भारताला होणार मोठा फायदा?