गुरुवारी (०७ ऑक्टोबर) पार पडलेल्या कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान राॅयल्सच्या सामन्यात केकेआरने राजस्थानला तब्बल ८६ धावांनी पराभूत केले. या विजयानंतर केकेआरने आयपीएल प्लेऑफमध्ये त्यांचे स्थान जवळपास पक्के केले आहे. केकेआरच्या विजयानंतर प्लेऑफच्या शर्यतीमध्ये असलेल्या मुबंई इंडियन्सच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा मात्र पूर्णपणे मावळल्या आहेत.
मुंबईसाठी आता प्लेऑफमध्ये पोहोचणे जवळपास अशक्य झाले आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी त्यांच्या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करत २५० पेक्षा अधिक धावा कराव्या लागतील आणि सनरायझर्स हैदराबादला १७० पेक्षा जास्त धावांनी पराभूत करावे लागणार आहे. जर मुंबईने नाणेफेक गमावली आणि त्यांना प्रथम गोलंदाजी करावी लागली तर प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अजूनच कमी होतात. कारण केकेआरने नेट रन रेट मुंबईपेक्षा खूप जास्त आहे.
मुंबई इंडियन्सला प्लोऑफमध्ये न पोहोचता येण्यामागचे प्रमुख कारणे त्यांच्या संघातील काही खेळाडू ठरले आहेत. या खेळाडूंनी आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात सतत खराब प्रदर्शन केले आहे आणि संघाच्या पराभवाचे प्रमुख कारण राहिले आहेत. या लेखात आपण मुंबईच्या अशाच तीन खेळाडूंविषयी माहिती घेणार आहोत, ज्यांनी त्यांच्या संघाला अडचणीत आणले आहे. तसेच या तिघांना आगामी टी२० विश्वचषकातही संधी दिली गेली असल्यामुळे भारतीय संघासाठीही ते अडचणीची बाब ठरू शकतात.
१. सूर्यकुमार यादव
सूर्यकुमार यादवला जेव्हापासून टी२० विश्वचषकासाठी संधी दिली गेली आहे, त्यानंतर त्याने सतत निराशाजनक प्रदर्शन केले आहे. सूर्यकुमारच्या खराब प्रदर्शनाचा परिणाम मुंबई इंडियन्सच्या आयपीएलमधील प्रदर्शनावर पडला आहे आणि आता संघ प्लोऑफमधून बाहेर होण्याच्या वाटेवर आहे. सूर्यकुमारला विश्वचषकात संधी देण्यासाठी निवडकर्त्यांनी श्रेयस अय्यरला राखीव खेळाडूंमध्ये ठेवले आणि त्याला १५ सदस्यीय संघात संधी दिली आहे. अशात आता संघात बदल करून श्रेयस अय्यरला सूर्यकुमारच्या बदल्यात संघात संधी देण्याबाबत मागणी केली जात आहे.
२. हार्दिक पांड्या
हार्दिक पांड्या मागच्या काही काळापासून खूपच खराब फॉर्ममध्ये दिसला आहे. तरीदेखील त्याला टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघात सामील केले गेले आहे. पांड्याने आयपीएल २०२१ च्या पूर्ण हंगामात खूपच खराब प्रदर्शन केले आहे. त्याच्या हंगामातील खराब प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्सच्या अडचणीत वाढ झाली आहे. त्याने हंगामात एकही चेंडू फेकला नाही, तसेच फलंदाजीतही काही कमाल करू शकला नाही. आयसीसीच्या नियमांप्रमाणे विश्वचषकापूर्वी १० ऑक्टोबरपर्यंत संघात बदल केला जाऊ शकतो. अशात पांड्याच्या जागी शार्दुल ठाकुरला संघात संधी देण्याच्या शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.
३. राहुल चाहर
राहुलच्या खराब प्रदर्शनामुळे मुंबई इंडियन्स संघ यावर्षी आयपीएल प्लेऑफमधून जवळपास बाहेर पडला आहे. मुंबई इंडियन्सने राहुलला खराब फॉर्ममुळे मागच्या काही सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्येही संधी दिली नाही. अशात तो टी २० विश्वचषकात भारतीय संघासाठी मोठी अडचण ठरू शकतो. राहुलला संघात सामील करण्यासाठी निवडकर्त्यांनी युजवेंजद्र चहलला विश्वचषकात संधी दिली नव्हती. त्यानंतर चहलने आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात अप्रतिम प्रदर्शन केले आणि निवडकर्त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. चाहते राहुललऐवजी चहलला संघात सामील करण्याची मागणी करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
चाहरच्या खुल्लम खुल्ला प्रपोजच्या भन्नाट योजनेमागचा ‘लव्ह गुरु’ अजून कोणी नव्हे, तर तो धोनीच
टी२० विश्वचषकात दुखापतग्रस्त चक्रवर्तीचा रिप्लेसमेंट कोण? ‘या’ २ नावांची होतेय भरपूर चर्चा
आयपीएलच्या १४ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकावेळी भिडणार ४ संघ, असे पाहता येतील सामने