भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्या कारणाने गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघाला जास्त क्रिकेट खेळता आले नाही. त्यात आयपीएल स्पर्धेतही कोरोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आयपीएल २०२१ स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. परंतु, आयपीएल स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला मोठे नुकसान झाले आहे. ते भरून काढण्यासाठी आयपीएल पुन्हा खेळवणे हाच एकमेव पर्याय आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएल २०२१ स्पर्धेतील उर्वरित सामने खेळवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. ज्यामुळे आणखी एक मोठी मालिका रद्द करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.
येत्या काही महिन्यात भारतीय संघाचे वेळापत्रक खूप व्यस्त असणार आहे. येत्या १८ जून ते २२ जून दरम्यान भारतीय संघाला, न्यूझीलंड संघाविरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळायचा आहे. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआयने इंग्लंड संघाविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेनंतर उर्वरित आयपीएल २०२१ स्पर्धेचे आयोजन सप्टेंबर महिन्यात करण्याचे योजिले आहे. त्यामुळे, दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध होणारी टी -२० मालिका रद्द करण्यात येण्याची शक्यता आहे.
या टी२० मालिकेचे आयोजन टी -२० विश्वचषक स्पर्धेपूर्वी केले जाणार होते. परंतु आयपीएल स्पर्धेमुळे टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळाडूंना फायदा होईल, असे बीसीसीआय तर्फे म्हटले जात आहे. बीसीसीआयच्या एका सूत्राने दिलेल्या माहितीत म्हटले की, “भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील मालिका तशीही होणार नव्हती आणि टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या सरावासाठी आयपीएलपेक्षा श्रेष्ठ काहीच असू शकत नाही.” मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिली गेली नाही.
असे म्हटले जात आहे की, येत्या सप्टेंबर महिन्यात आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार आहे. तसेच टी-२० विश्वचषक स्पर्धा झाल्यानंतर, न्यूझीलंड संघ भारतीय दौऱ्यावर येणार आहे. परंतु हे सर्व टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या वेळापत्रकावर निर्भर असणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
महत्त्वाची बातमी! भारताच्या इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत बदल; ‘या’ दिवशी होणार तिसरा सामना
ब्लाॅग- देश का गौरव : राहुल-सौरव
तब्बल २५ वर्षानंतर आमीर सोहेलचा व्यंकटेश प्रसादबरोबर झालेल्या ‘त्या’ चकमकीबद्दल मोठा खुलासा