आगामी ऑक्टोबर आमि नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक खेळला जाणार आहे. 2007 साली टी-20 विश्वचषक स्पर्धा सुरू झाली, तेव्हा भारताने पहिल्या हंगामाचे विजेतेपद पटकावले होते. परंतु त्यानंतर अद्याप संघाला टी-20 विश्वचषकाचे दुसरे विजेतेपद पटकावता आले नाहीये. पुढच्या काही दिवसांमध्ये विश्वचषकासाठी भारताचा 15 सदस्यीय संघ घोषित केला जाईल. तत्पूर्वी क्रिकेटचे जाणकार आणि माजी दिग्गज खेळाडू स्वतःचा हिशोबाने विश्वचषकासाठी खेळाडूंना निवडत आहेत. आता या यादीत सहभागी होत भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एका खेळाडूचे नाव घेतले, जो विश्वचषक संघासाठी चांगली गोलंदाजी करू शकतो.
मागच्या मोठ्या काळापासून टी-20 विश्वचषक (T20 World Cup 2022) जिंकून न शकलेला भारतीय संघ यावर्षी ही ट्रॉफी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्नात असेल. विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर खेळली जाणार आहे, ज्याठिकाणी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल परिस्थिती असते. भारताचे माजी दिग्गज कर्णधार सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांच्या मते युवा गोलंदाज दीपक चाहर टी-20 विश्वचषकात भारतासाठी चांगले प्रदर्शन करू शकतो.
माध्यामांशी बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “भारताच्या टी-20 विश्वचषक संघात दीपक चाहरला निवडले गेले पाहिजे. कारण ज्याठिकाणी आपण विश्वचषक खेळायला चाललो आहोत, ती ऑस्ट्रेलियाची धरती आहे. त्याठिकाणी गोलंदाजांना अधिकचा बाउंस मिळतो आणि दीपक चाहर असा गोलंदाज आहे, ज्याला नवीन चेंडू कसा स्विंग करायचा हे चांगले माहिती आहे. त्यामुळेच दीपकची निवड भारतीय संघासाठी महत्वाची असेल.”
दरम्यान, विश्वचषकासाठी भारतीय संघाची निवड पुढच्या आढवड्यात होणार आहे. आशिया चषक 2022 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही. जयप्रीत बुमराह संघात नसल्याचा तोटा स्पष्टपने दिसून आला. आता 11 सप्टेंबर रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान संघात आशिया चषकाचा अंतिम सामना खेळला जाईल. आशिया चषकातून बाहेर झाल्यानंतर कर्णधार रोहितने माहिती दिली होती की, टी-20 विश्वचषकासाठीचा 80 ते 90 टक्के संघ निश्चित झालेला आहे. आता विस्वचषकासाठी भारताचे संघ व्यवस्थापन 15 सदस्यीय संघात कोणत्या खेळाडूंना निवडतात, हे पाहावे लागणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकात का शांत आहे बाबर आझमची बॅट? खुद्द प्रशिक्षकांनीच सांगितलेय कारण
ASIA CUP: सामना सुरू होण्यापूर्वीच जवळपास निश्चित होणार आशिया चषकाचा विजेता, वाचा कसं काय
आशिया चषकातील खराब कामगिरीनंतर जॉन्टी रोड्सचा भारतीय संघाला विशेष सल्ला! म्हणाला…