भारतीय क्रिकेट संघाला मंगळवारी (०१ ऑगस्ट) वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या टी२० सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्धचा हा सामना ५ विकेट्सने गमावला आहे. त्यामुळे ५ सामन्यांची टी२० मालिका सध्या १-१ ने बरोबरीवर आली आहे. या पराभवानंतर भारतीय संघाच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. भारताचा स्टार गोलंदाज हर्षल पटेल हा पुढील तिसऱ्या सामन्यातून बाहेर झाला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने (BCCI) यासंदर्भात माहिती दिली आहे. बीसीसीआयने त्यांच्या ट्वीटर अकाउंटवरून माहिती देताना सांगितले की, हर्षल पटेल (Harshal Patel) दुखापतीमुळे तिसऱ्या टी२० सामन्यातून (Third T20I) बाहेर झाला आहे. तो बरगड्यांच्या दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्यासाठी अनुपलब्ध (Harshal Patel Ruled Out Of Third T20I) असेल. भारतीय संघाची मेडिकल टीम त्याच्या दुखापतीवर लक्ष ठेवून आहे. दुखापतीमुळेच तो पहिला आणि दुसरा टी२० सामनाही खेळू शकला नव्हता.
हर्षलची दुखापत वाढवू शकते भारतीय संघाची चिंता
वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर भारतीय संघाला आशिया चषक आणि टी२० विश्वचषकात सहभागी व्हायचे आहे. अशात हर्षलची दुखापत भारतीय संघाची चिंता वाढवू शकते. हर्षल सध्या चांगल्या फॉर्ममध्ये होता, त्यामुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजांविरुद्ध तो किफायतशीर गोलंदाजी करू शकला असता. त्याच्यात कोणत्याही फलंदाजी क्रमाला उध्वस्त करण्याची क्षमता असल्याने तो भारताच्या वेगवान गोलंदाजी आक्रमणाचा कणा बनला आहे.
मात्र जर त्याची दुखापत गंभीर असल्यास त्याचे येत्या आशिया चषक आणि टी२० विश्वचषकात खेळणे अवघड बनू शकते. ही भारतीय संघासाठी नक्कीच चिंता वाढवणाची बाब ठरेल.
https://twitter.com/BCCI/status/1554154935071416325?s=20&t=65GCDozj5Fwor_CkfV1RcQ
मालिका आली बरोबरीवर
दरम्यान भारतीय संघाने वनडे मालिकेनंतर टी२० मालिकेतही विजयी सुरुवात केली होती. २९ जुलै रोजी त्रिनिदाद येथे झालेला पहिला टी२० सामना भारतीय संघाने ६८ धावांच्या फरकाने जिंकला होता. फलंदाजी आणि गोलंदाजीतील दमदार प्रदर्शनामुळे भारतीय संघ या सामन्यात एकतर्फी विजय मिळवू शकला होता. मात्र त्यानंतर दुसऱ्या टी२० सामन्यात भारतीय संघाच्या खराब फलंदाजी प्रदर्शनामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भारतीय संघाने ५ विकेट्स राखून हा सामना गमावला. यासह आता ५ सामन्यांची ही टी२० मालिका १-१ ने बरोबरीत आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘आता मी निश्चिंत…’, दुसऱ्या टी-२० विजयानंतर पूरनने सोडला सुटकेचा निश्वास
…म्हणून कर्णधार रोहितने भुवनेश्वरला दिली नाही शेवटची ओव्हर, जाणून घ्या खरे कारण
मेकॉय पुढे टीम इंडियाची वाताहात! दुसरा टी२० जिंकत यजमानांनी मालिका आणली बरोबरीत