बांगलादेशातील राजकीय गोंधळानंतर आता परिस्थिती सामान्य होयला लागली आहे. मात्र, या देशात सरकार स्थापन झाल्यानंतरही सातत्यानं हिंसाचाराच्या बातम्या येत आहेत. यंदा बांगलादेशमध्ये महिला टी20 विश्वचषक (Women’s T20 World Cup) खेळवला जाणार आहे. पण यावेळी सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, बांगलादेशची परिस्थिती टी20 विश्वचषकासाठी योग्य आहे का? या परिस्थितीत खेळाडू सुरक्षित राहतील का? या प्रश्नाचे उत्तर ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार एलिसा हेलीने दिले आहे.
एलिसा हिली म्हणाली की, “आम्ही आशियाई खेळपट्ट्यांवर भरपूर क्रिकेट खेळलो आहे, बांगलादेशच्या संथ विकेट्सवर आम्हाला फारशी अडचण येणार नाही. आता ते आमच्या खेळाडूंवर अवलंबून आहे की ते स्वत:ला कसे तयार करतात. ती म्हणाला की, बांगलादेश असो किंवा इतर कोणताही देश, मला वाटत नाही की त्यांचा संघ म्हणून फारसा परिणाम होईल. आमचा संघ प्रत्येक परिस्थितीसाठी तयार आहे.”
3 ऑक्टोबरपासून महिला टी20 विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेचा अंतिम सामना 20 ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र, अद्यापपर्यंत आयसीसीनं टी20 विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेतलेला नाही. यावेळी बांगलादेशमध्ये खेळणे आव्हानात्मक असल्याचे हेलीने सांगितले. एलिसा हेली म्हणाली की, “सध्या बांगलादेशातील परिस्थिती सोपी नाही, तेथील जनतेला मदतीची गरज आहे. आयसीसीनं याबाबत निर्णय घ्यावा, अशी माझी इच्छा आहे.”
महत्त्वाच्या बातम्या-
“धोनी माझा दोस्त नाही…” भारताच्या स्टार गोलंदाजाचे खळबळजनक वक्तव्य!
मॅडनेस टॉप लेव्हल..! सूर्यकुमार यादवने बहिणीसोबत साजरा केला रक्षाबंधन, मजेशीर फोटो केले शेअर
कर्णधार रोहित काहीही विसरू शकतो, पण संघाच्या हिताची ‘ही’ गोष्ट विसरू शकत नाही!