आयपीएल 2021 मध्ये झालेल्या पाचव्या सामन्यात मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 10 धावांनी विजय मिळवला. मुंबई संघाच्या राहुल चाहरने आपल्या फिरकी गोलंदाजीने केकेआरच्या संघाचे 4 गडी बाद केले; तसेच शेवटच्या 3 षटकांत कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह, आणि ट्रेंट बोल्टने शानदार गोलंदाजी करत केकेआरच्या तोंडातून विजय खेचून आणला.
या सामन्यातील शेवटच्या षटकात बोल्टने गोलंदाजी करताना त्याने सलग 2 चेंडूत आंद्रे रसेल आणि पॅट कमिन्सला बाद करून मुंबईचा विजय निश्चित केला होता. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने बोल्टची मुलाखत घेतली. यावेळी बोल्टने हिंदीतून दिलेल्या उत्तराने अनेकांना आश्चर्य वाटले.
मुंबई इंडियन्सने या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओच्या शेवटी सूर्यकुमारने बोल्टला सांगितले की तो त्याची हिंदीची परिक्षा घेणार आहे. यावेळी सूर्यकुमारने बोल्टला हिंदीतून प्रश्न विचारला की “शेवटच्या षटकात 15 धावांचा बचाव करून तुला कसे वाटले?” यावर बोल्टने अगदी सहज उत्तर दिले की ‘लास्ट ओव्हर… बहुत अच्छा (शेवटचे षटक..खुपच छान)’.
बोल्टच्या या हिंदीतील उत्तराने चाहत्यांची मने जिंकली. त्यांच्या या मुलाखतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
⚡ 'बहुत अच्छा' ⚡@trent_boult describes his experience to @surya_14kumar after defending 15 runs from the last over ????????#OneFamily #MumbaiIndians #MI #IPL2021 #KKRvMIpic.twitter.com/vuoEHVlg9N
— Mumbai Indians (@mipaltan) April 14, 2021
सुर्यकुमारची केकेआरविरुद्ध फटकेबाजी
या केकेआरविरुद्धच्या सामन्यात सूर्यकुमारने शानदार फलंदाजी करत अर्धशतक ठोकले. त्याने अवघ्या 36 चेंडूंत 56 धावा फटकावल्या. आपल्या या खेळीत त्याने 7 चौकार आणि 2 षटकार ठोकले. इतकेच नाही तर पॅट कमिन्सच्या चेंडूवर त्याने एक गगनचुंबी षटकार ठोकत अर्धशतकाला गवसणी घातली होती. त्याचा तो षटकार पाहून हार्दिक पंड्याही आश्चर्यचकीत झाला होता. त्याच्या या षटकाराची चर्चा सर्वत्र होती.
या षटकाराबद्दलही सूर्यकुमारने ट्रेंट बोल्टबरोबरील चर्चेदरम्यान खुलासा केला. त्याने सांगितले की ‘त्या षटकारावेळी जो शॉट मी खेळलो, तो मी ट्रेंट बोल्टकडून शिकलो आहे.’
मुंबईचा रोमांचक विजय
या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सर्वबाद 152 धावा केल्या आणि कोलकाताला 153 धावांचे आव्हान दिले. मुंबईकडून सूर्यकुमार यादवने 36 चेंडूत सर्वाधिक 56 धावांची खेळी केली. तर कर्णधार रोहित शर्माने 32 चेंडूत 43 धावांची खेळी केली. तसेच कोलकाताकडून गोलंदाजी करताना आंद्रे रसलने 2 षटकांत 5 विकेट्स घेण्याचा कारनामा केला.
यानंतर 153 धावांच्या आव्हानाचा पाठालाग करण्यासाठी उतरलेल्या कोलाकाताकडून केवळ नितीश राणानेच एकाकी झुंज देत अर्धशतक ठोकत 47 चेंडूत 57 धावा केल्या. त्याच्याव्यतिरिक्त कोणालाही खास काही करता आले नाही. त्यामुळे कोलकाताचा डाव 142 धावांवर संपला आणि मुंबईने 10 धावांनी विजय मिळवला. जसप्रीत बुमराह, कृणाल पंड्या आणि ट्रेंट बोल्ट यांनी अखेरच्या ४ षटकांत कोलकाताला ३० धावांची गरज असताना केवळ १९ धावाच करु दिल्या. त्यामुळे मुंबईला या सामन्यात विजय मिळवता आला.
महत्त्वाच्या बातम्या –
मराष्ट्रात लॉकडाऊन; मुंबईतील आयपीएल सामन्यांचे काय? घ्या जाणून
रोहित शर्माबद्दल ‘तसं’ ट्वीट करणे स्वीगीला पडले महागात; मागावी लागली चाहत्यांची माफी
SRHvsRCB : बेंगलोरच्या गोलंदाजांच्या अखेरच्या क्षणी टिच्चून मारा; हैदराबादवर ६ धावांनी मिळवला विजय