आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 42 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 59 धावांनी दणदणीत विजय मिळवला. सलामीवीर नितीश राणा, अष्टपैलू सुनील नरेन यांनी अर्धशतके करत या विजयात मोलाची कामगिरी पार पडली. मात्र, याचवेळी केकेआरचा युवा फिरकीपटू वरूण चक्रवर्तीविरुद्ध दिल्लीचे फलंदाज सपशेल अपयशी ठरले. वरूणने या सामन्यात 5 गडी बाद केले आणि संघाला विजय मिळवून दिला.
दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यर (47 धावा) आणि युवा फलंदाज रीषभ पंत (27 धावा) यांनी तिसर्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केली. वरुण चक्रवर्तीने पंतला त्याच्या पहिल्याच षटकात बाद केले. त्यानंतर अय्यर आणि शिमरॉन हेटमायर (10 धावा) यांना दुसऱ्या षटकात सलग दोन चेंडूत बाद केले. त्यानंतरच्या षटकात अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसच्या रुपाने वरुणला चौथा गडी बाद करण्यात यश आले. त्याच षटकात त्याने अक्षर पटेलला त्रिफळाचित केले.
वरूणने तीन षटकांत 12 धावा देऊन पाच गडी बाद केले. त्यानंतर त्याच्या अखेरच्या षटकात त्याला गडी बाद करण्यात यश आले नाही.
या हंगामात वरुण चक्रवर्ती पाच बळी घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. या सामन्यात त्याने गोलंदाजी करताना चार षटकांत एकूण 20 धावा देऊन पाच बळी घेतले. याच सामन्यात कोलकाताकडून दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने चार षटकांत 17 धावा देऊन तीन गडी बाद केले. तर अनुभवी वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने एक गडी बाद केला. त्यामुळे दिल्लीला 195 धावांचा पाठलाग करताना केवळ 135 धावाच करता आल्या. दिल्लीकडून कर्णधार श्रेयस अय्यरने सर्वाधिक 47 धावा केल्या.
प्रथम फलंदाजी करणाऱ्या केकेआरचा सलामीवीर नितीश राणा (53 चेंडूत 13 चौकार आणि एक षटकार) आणि अष्टपैलू सुनील नरेन ( 32 चेंडूत 6 चौकार आणि 1 षटकार) यांनी चौथ्या विकेटसाठी 56 चेंडूत 115 धावांची भागीदारी केली. या भागीदारीमुळेच संघाला 194 धावांचे विशाल धावसंख्या गाठण्यात यश आले.
दिल्ली कॅपिटल, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांचे प्रत्येकी 14 गुण आहेत. 11 सामन्यांमध्ये मिळवलेल्या सात विजयासह रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ गुणतालिकेत दुसर्या स्थानावर आहे. केकेआर संघ या विजयामुळे आता 12 गुणांसह चौथ्या स्थानावर आला आहे.
कोण आहे वरुण चक्रवर्ती?
चक्रवर्ती हा 2019च्या आयपीएल लिलावात जयदेव उनाडकट बरोबरच सर्वात महागडा ठरलेला खेळाडू आहे. त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबने 8.40 कोटींची बोली लावून संघात सामील करुन घेतले होते. त्यानंतर २०२० आयपीएलसाठी झालेल्या लिलावात त्याला कोलकाता नाईट रायडर्सने ४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले आहे.
वयाच्या 13 व्या वर्षी यष्टीरक्षक फलंदाज म्हणून क्रिकेटला सुरुवात केलेल्या वरुणने नंतर आर्किटेक्चरमध्ये शिक्षण घेण्यासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला. त्याने चेन्नईमधील एसआरएम विद्यापीठातून पाचवर्षांची आर्किटेक्टची पदवी घेतली.
पण क्रिकेटच्या प्रेमापोटी त्याने आर्किटेक्ट फर्ममधील नोकरी सोडत पुन्हा क्रिकेटकडे आपला मोर्चा वळवला. तो क्रोमबेस्ट क्रिकेट क्लबमध्ये सामील झाला. पण त्यानंतर त्याला घुडघ्याची दुखापत झाली. त्यामुळे त्याने फिरकी गोलंदाजी करणे पसंत केले.
27 वर्षीय वरुण तमिळनाडू प्रीमियर लीगमध्ये(टीएनपीएल) केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे सर्वांच्या समोर आला होता. त्याने या स्पर्धेत 9 विकेट्स घेतल्या होत्या.
विषेश म्हणजे वरुणने चेन्नई सुपर किंग्जच्या आणि कोलकता नाईट रायडर्स संघाच्या नेटमध्येही आयपीएलमध्ये येण्याआधी गोलंदाजीही केली आहे. कोलकताच्या नेटमध्ये गोलंदाजी करत असताना त्याला सुनील नारायण, कुलदीप यादव या गोलंदाजांचा सहवास मिळाला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
करामती खान! राशिदच्या न उमगणाऱ्या फिरकीवर केएल राहुलची दांडी गुल, पाहा व्हिडिओ‘
बेबी सिटर रिषभ पंतची आणखी एक टी२० कसोटी खेळी’, सावकाश खेळी केल्यानंतर पंत ट्रोल
ट्रेंडिंग लेख –
वॉटसनसह ‘या’ ३ दिग्गजांना पुढच्या हंगामात मिळणार डच्चू?
आयपीएल२०२०: टी२० मधील स्टार असूनही ‘या’ ३ खेळाडूंना अद्यापही मिळाली नाही खेळण्याची संधी
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी