भारत आणि बांगलादेश (India And Bangladesh) संघातील 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामन्यात भारताने बांगलादेशचा 280 धावांनी दारूण पराभव केला. हा सामना चेन्नईच्या चेपाॅक स्टेडियमवर रंगला होता. दोन्ही डावात भारताने चमकदार कामगिरी केली. भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) 2022च्या भीषण कार अपघातानानंतर कसोटीत धमाकेदार पुनरागमन केले. त्याने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात दुसऱ्या डावात फलंदाजी करताना शानदार शतक झळकावले. त्यावर आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू ॲडम गिलख्रिस्टने वक्तव्य केले आहे.
ऑस्ट्रेलियाचा महान यष्टीरक्षक फलंदाज ॲडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) क्लब पेरियार पॉडकास्टवर रिषभ पंतच्या (Rishabh Pant) पुनरागमनाचे कौतुक करताना म्हटले की, “रिषभ पंतचे पुनरागमन हे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठे पुनरागमन आहे. मी असे म्हणू इच्छितो की मानसिक आणि शारीरिक तणाव सहन केल्यानंतर, यापेक्षा अधिक उत्कृष्ट पुनरागमन नाही.”
मायदेशात गेल्या 17 कसोटी मालिकेत भारताचा पराभव झाला नाही. याचीही क्लब पेरियार पॉडकास्टवर चर्चा झाली. घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत भारताचा शेवटचा पराभव 2012 मध्ये इंग्लंडविरुद्ध झाला होता. त्यावेळी ॲलिस्टर कुक (Alastainr Cook) इंग्लंडचा कर्णधार होता. त्या 4 सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडने भारताचा 2-1 असा पराभव केला होता.
डिसेंबर 2022च्या भीषण कार अपघातानंतर रिषभ पंत (Rishabh Pant) बांगलादेशविरूद्ध आपला पहिलाच कसोटी सामना खेळला. या सामन्यात त्याने संस्मरणीय पुनरागमन केले. बांगलादेशविरूद्धच्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात फलंदाजी करताना त्याने 39 धावा केल्या. दुसऱ्या डावात फलंदाजी करताना पंत चांगल्याच लयमध्ये दिसला. त्याने 128 चेंडूचा सामना करत 109 धावा ठोकल्या. दरम्यान त्याने 13 चौकारांसह 4 षटकार लगावले. पंतच्या कसोटी आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमधील हे 6वे शतक होते.
महत्त्वाच्या बातम्या-
IND vs BAN: दुसऱ्या सामन्यातही विजय फिक्स? कानपूरच्या मैदानावर भारताची आकडेवारी शानदार
IND vs BAN: पराभवानंतर बांगलादेशला दुसरा झटका, दुखापतीमुळे स्टार खेळाडू होणार बाहेर?
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफीपूर्वी ऑस्ट्रेलिया दिग्गजाचे बुमराहबद्दल मोठे वक्तव्य