भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघा दरम्यान दिवस-रात्र कसोटी सामना खेळला गेला. हा सामना अनिर्णित राहिला आहे. पण, या सामन्यातील एक झेल खूप चर्चेत राहिला. त्याचे चाहत्यांकडून खूप कौतुक होत आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी पहिल्या डावात शतक झळकावणारी भारताची स्टार फलंदाज स्म्रीती मंधना दुसऱ्या डावातही उत्कृष्ट लयीत दिसत होती. पण ऑस्ट्रेलियन खेळाडू ऍश्ले गार्डनरने बाउंड्री लाईनवर अद्भुत झेल पकडला आणि स्म्रीतीचा डाव संपवला.
भारताच्या पहिल्या डावात १२७ धावांची अतुलनीय खेळी खेळणाऱ्या मंधनाने दुसऱ्या डावात ४८ चेंडूत ३१ धावा केल्या होत्या. त्यावेळी ती ६५ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत होती, या खेळीत तिने ६ चौकारही लगावले.
भारताच्या दुसऱ्या डावातील १८ व्या षटकात स्म्रीतीने ऑस्ट्रेलियन डावखुरी फिरकी गोलंदाज सोफी मॉलिनेक्सला षटकार मारण्याच्या प्रयत्न केला. तिने हा शॉट खूप छान खेळला, असे वाटत होते की चेंडू आरामात एक टप्पा खाऊन सीमापार जाईल पण, गार्डनरने तिचा हा प्रयत्न हाणून पाडला. सीमारेषेवर सुमारे १० मीटर धावल्यानंतर तिने डायव्ह मारली आणि उत्कृष्ट झेल घेतला आणि त्यामुळे मंधनाला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.
A boundary-line blinder from Ashleigh Gardner! #AUSvIND | @CommBank pic.twitter.com/SQh7gL4ivB
— cricket.com.au (@cricketcomau) October 3, 2021
भारताने चौथ्या दिवशी दुसऱ्या डावात तीन बाद १३५ धावांवर आपला डाव घोषित केला. चौथ्या आणि शेवटच्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने २ गडी बाद ३६ धावा केल्या आणि सामना अनिर्णित राहिला. महिला कसोटी सामना फक्त चार दिवसांचा असतो. या सामन्यात पावसामुळे पहिल्या दोन दिवशी बराच काळ अडथळा आला होता.
तत्पुर्वी, भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीस आलेल्या मंधना आणि शेफाली वर्मा यांनी भारतीय संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. शेफाली ६४ चेंडूत चार चौकारांच्या मदतीने ३१ धावांवर बाद झाली. तिला मोलिनेक्सने ताहिला मॅकग्राच्या हाती झेलबाद केले. २६ व्या षटकात शेफालीची विकेट पडली होती.
ऑस्ट्रेलिया संघाकडून तब्बल ८ खेळाडूंनी गोलंदाजी केली पण ते भारतीय महिला संघास सर्वबाद करण्यात अपयशी ठरले. भारतीय कर्णधार मिताली राजने अखेर ३७७ धावांवर भारताचा पहिला डाव घोषित केला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पहिल्या डाव ९ बाद २४१ धावांवर घोषित केला होता. त्यामुळे भारताला १३६ धावांची आघाडी मिळाली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
सनरायझर्सचा पहिला ‘शंभर नंबरी’ बनला भुवी
कदरदान स्टार्क! युवा महिला वेगवान गोलंदाजाला केली ‘मौल्यवान’ मदत
‘खास खेळाडू महान गोष्टींसाठी बनलेले असतात’, ऋतुराज गायकवाडवर होतोय कौतुकाचा वर्षाव