सोमवारी(2 सप्टेंबर) भारतीय क्रिकेट संघाने वेस्ट इंडीज विरुद्ध सबिना पार्क, किंग्स्टन येथे पार पडलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 257 धावांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा इतिहास रचला आहे.
विराट भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला आहे. त्याने भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या एमएस धोनीच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
सोमवारी मिळवलेला विजय विराटचा कसोटी कर्णधार म्हणून 28 वा विजय ठरला आहे. त्यामुळे त्याने भारताचा माजी कर्णधार धोनीच्या 27 कसोटी विजयांच्या विक्रमाला मागे टाकले आहे.
विराटने कसोटीमध्ये आत्तापर्यंत 48 सामन्यात भारताचे नतृत्व केले आहे. यामध्ये त्याने 28 सामन्यात विजय मिळवला आहे. तर 10 सामन्यात पराभव स्विकारला आहे. त्याचबरोबर 10 सामने अणिर्नित राहिले आहेत.
भारताकडून सर्वाधिक कसोटी विजय मिळवण्याच्या यादीत विराट आणि धोनी पाठोपाठ सौरव गांगुली असून त्याने 21 विजय मिळवले आहेत.
कसोटीत सर्वाधिक विजय मिळवणारे भारतीय कर्णधार –
28 – विराट कोहली (48 सामने)
27 – एमएस धोनी (60 सामने)
21 – सौरव गांगुली (49 सामने)
14 – मोहम्मद अझरुद्दीन (47 सामने)
9 – सुनील गावस्कर (47 सामने)
9 – मन्सुर अली पतौडी (40 सामने)
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–वाढदिवस विशेष: वेगवान गोलंदाज इशांत शर्माबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी
–बड्डे बाॅय इशांत: ट्रोल तर कराच पण कौतूकाची थापही जरूर द्या!