रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह हे भारताचे सध्याचे महत्वाचे खेळाडू आहेत. हे बीसीसीआयचे (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) अ दर्जाच्या श्रेणीचे खेळाडू आहेत. यामुळे त्यांना करारानुसार सात कोटी रुपये वार्षिक वेतन मिळते. मात्र यांवर होणारा खर्च आणि ते जेवढे सामने खेळतात याचा नीट विचार केला असता, एकच प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे बोर्ड यांच्यावर ऐवढा खर्च का करत आहेत?
बीसीसीआय विराट कोहली (Virat Kohli), रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) यांना सात कोटी रुपये वार्षिक वेतन देते. तर वर्षभरात या तीन खेळाडूंवर क्रिकेट बोर्ड २१ कोटी रुपये खर्च होतो. तसेच या तिघांनी एकत्र २१ टक्केच सामने खेळले आहेत.
मार्च २०२०मध्ये सर्वत्र कोरोनाने धुमाकुळ घातला होता. यानंतर भारताने क्रिकेटचे तिन्ही प्रकार मिळून एकूण ७३ सामने खेळले होते. यातील ४४ सामने भारताने जिंकले तर २५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तीन सामने अनिर्णीत राहिले तर एका सामन्याचा निकालच लागला नाही. यातील १६ सामने असे होते ज्यामध्ये हे तिघे खेळले होते. तेव्हा ९ सामने भारत जिंकला होता. तर सहा सामन्यांमध्ये पराभूत झाला होता. तसेच १४ सामन्यांमध्ये या तिघांपैकी कोणीही खेळले नाही.
कोरोनाच्या काळात सर्वाधिक कमी सामने खेळण्याचा पराक्रम बुमराहने केला आहे. त्याने लॉकडाउनच्या काळात ३२ सामने खेळले होते. त्यातील १५ सामने भारताने जिंकले तर १५ सामने हरले होते. दोन सामने अनिर्णीत राहिले. या सामन्यांमध्ये त्याने २२.७५च्या सरासरीने ८७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर चार वेळा ५ विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. मागील दोन वर्षांपासून तो ४१ सामन्यांत खेळला नाही.
रोहितनेही ३२ सामने खेळले नाहीत. त्याने खेळलेल्या ४१ सामन्यांपैकी ३० सामने भारताने जिंकले. तर ९ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दोन सामने अनिर्णीत राहिले. त्याने खेळलेल्या ५२ डावांमध्ये ३७.६७च्या सरासरीने १८४६ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतक आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे. तो दोन वेळा शून्यावरही बाद झाला होता.
विराट कोहली तब्बल २७ सामने खेळला नाही
विराटने खेळलेल्या ४६ सामन्यात भारताने २६ सामने जिंकले, तर १९ सामन्यांत पराभव झाला असून एक सामना अनिर्णीत राहिला. विराटने ५६ डावांमध्ये ३४.७६च्या सरासरीने १८०८ धावा केल्या. यादरम्यान त्याने १८ अर्धशतके केली असून सात वेळा शुन्यावर बादही झाला. यावेळी २७ सामन्यात तो भारतीय संघाचा भाग नव्हता. तसेच वेस्ट इंडिजच्या दौऱ्यासाठी त्याला संघातून वगळले आहे. आगामी टी२० विश्वचषकासाठी त्याने अधिक सामने खेळावे मात्र त्याला आराम दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
तीन वर्षांपूर्वीची जखम आज भरून काढणार? मँचेस्टरच्या मैदानावरील इतिहास बदलण्यासाठी रोहित सेना सज्ज
विराटला समर्थन देणाऱ्या पीटरसनच्या पोस्टखाली अनुष्काचा रिप्लाय, पाहून तुम्हीही म्हणाल, ‘एकदम कडक!’
पीव्ही सिंधूच्या शिरपेचात मानाचा तुरा! सिंगापूर ओपन २०२२मध्ये पटकावले विजेतेपद