---Advertisement---

पुढचा नंबर विराटचा? अश्विनच्या निवृत्तीनंतर कोहली 2011 च्या वर्ल्ड चॅम्पियन संघाचा एकमेव सक्रिय खेळाडू

On: गुरूवार, डिसेंबर 19, 2024 2:11 PM
---Advertisement---

रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीने क्रिकेटचा एक अध्याय संपुष्टात आला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यावर निवृत्ती घेण्यासोबतच अश्विनने एका खास क्लबमध्येही प्रवेश घेतला. त्याच्याआधी माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळे आणि महेंद्रसिंग धोनी यांनीही ही कामगिरी केली आहे. धोनीने 2014 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर अनिल कुंबळेने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या घरच्या मालिकेद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

आर. अश्विनच्या निवृत्तीमुळे विराट कोहली आता एकमेव खेळाडू संघात राहिला आहे. ज्याने भारताला 2011चा विश्वचषक जिंकून दिला आणि अजूनही खेळत आहे. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील त्या संघातील सर्व खेळाडू आता निवृत्त झाले आहेत. ज्यात सचिन तेंडुलकर, वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, युवराज सिंग, सुरेश रैना, युसूफ पठाण, आशिष नेहरा, हरभजन सिंग, झहीर खान, श्रीशांत, मुनाफ पटेल, दिग्गजांचा समावेश आहे. पियुष चावला, प्रवीण कुमार यांचा समावेश होता. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या त्या रोमहर्षक फायनलमध्ये श्रीलंकेचा पराभव करून भारताने 28 वर्षांनंतर ट्रॉफी जिंकली.

मालिकेच्या मध्यावर रविचंद्रन अश्विनची निवृत्ती लोकांना आश्चर्यचकित करत आहे. तेही जेव्हा संघ त्याच्यावर खूप अवलंबून होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांची बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेनमध्ये पावसाने ओढलेली तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर चौथी कसोटी 26 डिसेंबरपासून मेलबर्नमध्ये खेळवली जाणार आहे. 2008 मध्ये तिसऱ्या कसोटीनंतर कुंबळेने निवृत्ती जाहीर केली, तेव्हा भारत चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर होता. अखेर भारताने मालिका 2-0 ने जिंकली.

हेही वाचा-

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथी कसोटी मेलबर्नमध्ये, बाॅक्सिंग डे टेस्टमध्ये टीम इंडियाचा विक्रम कसा?
निवृत्तीनंतर दुसऱ्याच दिवशी अश्विन चेन्नईत पोहचला, घरी भावनिक स्वागत; पाहा VIDEO
‘अश्विन’ची निवृत्ती ही तर फक्त सुरुवात, आगामी काळात संघात मोठे बदल होणार

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---