भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवण्याची सुवर्णसंधी होती. परंतु पावसाने अडथळा निर्माण केल्यामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. हा सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. सामन्यानंतर झालेल्या मुलाखतीत विराट कोहलीने असे काही म्हटले आहे, ज्यावरून आर अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विनला बसवूनअंतिम ११ जणांच्या भारतीय संघात रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली होती. जडेजाने या संधीचे सोने करत पहिल्या डावात तुफानी अर्धशतक झळकावले होते. संघातील खेळाडूंची ही कामगिरी पाहून विराट कोहलीला भरपूर आनंद झाला. हा सामना झाल्यानंतर विराटने म्हटले की, “येणाऱ्या सामन्यांमध्ये हा संघ आदर्श संघ असेल.”
कोहलीने म्हटले की,”आम्हाला आमची सर्वोत्कृष्ट प्लेइंग इलेव्हेन मिळाली आहे. हा संघ पुढे जाऊन आदर्श संघ ठरेल.” कोहलीच्या म्हणण्यानुसार, येणाऱ्या सामन्यांमध्ये देखील भारतीय संघ ४ वेगवान गोलंदाज आणि १ फिरकी गोलंदाजांसह मैदानात उतरू शकतो. त्यामुळे आर अश्विनच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आर अश्विन किंवा रवींद्र जडेजा यांपैकी एकाच फिरकी गोलंदाजाला या संघात खेळण्याची संधी मिळू शकते.(Virat Kohli said that the First test team serve as a template means no chance to r Ashwin)
जडेजाला देण्यात आली होती संधी
पहिल्या कसोटी सामन्यात आर अश्विन ऐवजी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आली होती. पहिल्या कसोटी सामन्यातील दोन्ही डावात त्याला एकही गडी बाद करण्यात यश आले नव्हते. परंतु, त्याने फलंदाजी करताना तुफानी फटकेबाजी करत ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली होती.
आर अश्विनला बाहेर केल्यानंतर माजी भारतीय क्रिकेटपटू वीवीएस लक्ष्मण यांनी म्हटले होते की,”मी आर अश्विनला प्रत्येक कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हेनमध्ये संधी देईल. कारण तो आक्रमक गोलंदाज आहे.”
महत्त्वाच्या बातम्या –
‘शार्दुल ठाकूरच गोलंदाजी प्रशिक्षकांना अधिक शिकवत असेल’, दिनेश कार्तिकचे खळबळजनक विधान
बुमराहची विक्रमी कामगिरी! ट्रेंट ब्रिज कसोटीत ९ विकेट्स घेत जहीर, इरफानसारख्या दिग्गजांना टाकले मागे