कार्डिफ | भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी (६ जूलै) कर्णधार म्हणुन १००वा आंतरराष्ट्रीय सामना खेळणार आहे. हा सामना भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ५००वा सामना ठरणार आहे.
विराट कोहलीने आजपर्यंत कारकिर्दीत ३३४ आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्यात त्याने ५५.३३च्या सरासरीने १७१५४ धावा केल्या आहेत.
३३४ सामन्यांपैकी ९९ सामने तो कर्णधार म्हणुन खेळला आहे. त्यात त्याने ६७.४६च्या सरासरीने ६६७९ धावा केल्या आहेत.
विराटने ९९ पैकी ४९ वनडेत, १५ टी२० आणि ३५ कसोटीत भारतीय संघाच नेतृत्व केलं आहे.
जर त्याने आजच्या सामन्यात भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली तर तो १०० सामन्यात आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करणारा पाचवा भारतीय ठरणार आहे.
एमएस धोनी (३३१), मोहम्मद अझरुद्दीन (२२१), सौरव गांगुली (१९६) आणि राहुल द्रविड (१०४) यांनी १००पेक्षा अधिक सामन्यात देशाचे नेतृत्व केले आहे.
यामध्ये भारत सोडून इतर संघाचे आंतरराष्ट्रीय सामन्यात नेतृत्व करण्याची संधी मिळालेला गांगुली हा एकमेव कर्णधार आहे. त्याने अशिया ११ संघाचं नेतृत्व केले होते.
जागतिक क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूंनी १००पेक्षा जास्त सामन्यात देशाचे नेतृत्व केले आहे त्यात विराट कोहलीची सरासरी सर्वाधिक अर्थात ६७.४६ आहे तर दुसऱ्या स्थानावर एबी डिवीलियर्स असुन त्याची सरासरी ५६.९१ आहे. अन्य कोणत्याही कर्णधाराची सरासरी ४९च्या पुढे नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
-असा काय विक्रम गोलंदाजीत झालायं ज्याची जगभरात आहे चर्चा!
-विशेष मुलाखत- शिव छत्रपती पुरस्कार मिळाला की कबड्डी कारकीर्दीचं सार्थक झालं असं समजेन- गिरीश इरनक
-विंबल्डनचे चाहते आहात? मग या १० गोष्टी माहित असायलाच हव्यात..