---Advertisement---

असे दिवस विराट कोहलीवर कधी आले नव्हते!!

On: रविवार, मार्च 1, 2020 1:17 PM
---Advertisement---

क्राईस्टचर्च। कालपासून(29 फेब्रुवारी) न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात हेगली ओव्हल स्टेडियमवर दुसरा कसोटी सामना सुरु झाला आहे. या सामन्यात आज(1 मार्च) दुसऱ्या दिवसाखेर भारताने दुसऱ्या डावात 6 बाद 90 धावा केल्या आहेत.

या डावातही भारताचा कर्णधार विराट कोहलीला मोठ्या धावा करण्यात अपयश आले. त्याला 14 धावांवर कॉलिन डी ग्रँडहोमने पायचीत केले. त्यामुळे विराट कोहलीसाठी फलंदाज म्हणून हा दौराही अपयशी ठरला आहे.

परदेशी दौऱ्यात सर्वात कमी धावा  – 

विराटने या न्यूझीलंड दौऱ्यात टी20, वनडे आणि कसोटी या तीन्ही मालिकांमध्ये मिळून 11 डावात 218 धावा केल्या आहेत. त्यामुळे परदेश दौऱ्यात क्रिकेटच्या तीन्ही प्रकारच्या मालिका खेळल्यानंतर विराटच्या या सर्वात कमी धावा आहेत. याआधी 2014 ला केलेल्या इंग्लंड दौऱ्यात विराटने 254 धावा केल्या होत्या.

कसोटी मालिकेत 20 धावांचा टप्पा ओलांडण्यातही अपयश – 

त्याचबरोबर विराटने या कसोटी मालिकेत 2 सामने खेळताना 4 डावात अनुक्रमे 2, 19, 3, 14 धावा केल्या आहेत. त्यामुळे असे विराटच्या कारकिर्दी असे दुसऱ्यांदाच झाले की 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत विराटने एकदाही 20 धावांचा टप्पा न ओलांडला नाही. याआधी 2017 ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत विराटला 20 धावांचा टप्पा ओलांडता आला नव्हता.

दुसऱ्या क्रमांकाची निचांकी सरासरी – 

तसेच विराटने न्यूझीलंड विरुद्धच्या या कसोटी मालिकेत 4 डावात मिळून 9.50 च्या सरासरीने केवळ 38 धावा केल्या. त्यामुळे विराटची ही 2 किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या क्रमांकाची निचांकी सरासरी आहे. याआधी विराटने 2017 ला भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात झालेल्या कसोटी मालिकेत 9.20 च्या सरासरीने 5 डावात 46 धावा केल्या होत्या.

संपूर्ण दौऱ्यात एकही शतक नाही – 

तसेच विराटने संपूर्ण परदेशी दौऱ्यात एकही शतक न करण्याची ही चौथीच वेळ होती. याआधी 2011 ला वेस्ट इंडिज दौऱ्यात, 2014 ला इंग्लंड दौऱ्यात आणि 2015 ला बांगलादेश दौऱ्यात विराटला शतकी खेळी करता आली नव्हती.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---