बडोद्याचा क्रिकेटर विष्णू सोलंकी (Vishnu Solanki) याने शुक्रवारी (२५ फेब्रुवारी) रणजी ट्रॉफी २०२२ (Ranji Trophy 2022) स्पर्धेमध्ये चंदीगडविरुद्ध शतक झळकावले. काही दिवसांपूर्वीच सोलंकी याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला. त्याच्या नवजात मुलीचे निधन झाले होते. हे दु:ख विसरून मुलीचे अंतिम संस्कार करून विष्णू संघात सामील झाला होता. त्याने दुसऱ्या दिवशी अप्रतिम शतक लगावले. यानंतर चाहत्यांनी आणि माजी क्रिकेटपटूंनी त्याच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
चंदीगडने पहिल्या डावात १६८ धावा केल्या. प्रत्युत्तरात बडोद्याने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ७ बाद ३९८ धावा केल्या. संघाला २३० धावांची आघाडी मिळाली. पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सोलंकीने १६१ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या. या शानदार खेळीत त्याने १२ चौकार मारले. त्याच्या खेळीमुळे बडोदा संघ ४०० धावांच्या जवळ पोहोचला. सलामीवीर ज्योतनील सिंगने ९६ धावा केल्या. तो धावबाद झाला.
क्रिकेटर शेल्डन जॅक्सनने (Sheldon Jackson) सोशल मीडियावर विष्णू सोलंकी याच्या कामगिरीला सलाम करत लिहिले आहे की, “ज्यांना मी ओळखतो त्यांपैकी तो सर्वात मजबूत खेळाडू आहे. विष्णूला व त्याच्या कुटुंबाला सलाम. हे सोपे नाही. तू खूप शतके झळकव आणि यश मिळव.” तसेच अनेक क्रिकेट चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.
What a player . Has to be the toughest player i have known. A big salute to vishnu and his family by no means this is easy🙏 wish you many more hundreds and alot of success 🙏🙏 pic.twitter.com/i6u7PXfY4g
— Sheldon Jackson (@ShelJackson27) February 25, 2022
A story of a Cricketer who lost his new born daughter a few days ago.He attends the funeral and gets back to represent his team @BCCIdomestic @cricbaroda to get a hundred.His name may not make social media "likes",but for me #vishnoosolanki is a real life hero. An inspiration!
— shishir hattangadi (@shishhattangadi) February 25, 2022
Baroda cricketer Vishnu Solanki lost his daughter few days back then he returned to the state team for playing Ranji Trophy and scored a terrific hundred against Chandigarh.
— imarpit (@imarpit23) February 25, 2022
Heard about Vishnu Solanki!!
Unreal strength and dedication man!!
👏👏
You have already won in life at many levels…— Ash (@pikachuwala) February 25, 2022
काही दिवसांपूर्वीच त्याची नवजात मुलगी जन्मानंतरच मरण पावली. या घटनेने कोणतीही व्यक्ती खचून गेली असती, पण ही घटना बाजूला ठेवून विष्णू बडोद्याचा रणजी सामना खेळण्यासाठी कटकला पोहोचला. पहिला सामना खेळताना विष्णू सोलंकीने १०३ धावांची नाबाद खेळी खेळी खेळत शतक झळकावले. सोलंकीने आपल्या खेळीसाठी १६१ चेंडू खेळून १२ चौकार मारले, जे पूढील काळात लक्षात राहील.
विष्णू ११ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री सोलंकीच्या मुलीचा जन्म झाला होता. मुलगी झाल्याचा त्याचा आनंद फार काळ टिकू शकला नाही. अवघ्या २४ तासांमध्ये त्याची मुलगी मरण पावली. विष्णू त्यावेळी रणजी स्पर्धा खेळण्यासाठी भुवनेश्वरमध्ये होता. मुलीच्या निधनाची बातमी समजताच तो बडोद्याला गेला. मुलीवर अंत्यसंस्कर करून तो तीन दिवसांमध्ये संघात परतला आणि त्याने शतक झळकावले.
महत्वाच्या बातम्या-
पहिल्या टी२०तील पराभवानंतर श्रीलंकेला दुहेरी धक्का! ‘हे’ २ खेळाडू भारताविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
केव्हा, कुठे आणि कसा पाहाल भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी२० सामना? जाणून घ्या एका क्लिकवर