डेविड वॉर्नर हा आयपीएलमधील आघाडीचा खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०१६ साली त्याच्या नेतृत्वाखाली सनरायजर्स हैदराबाद संघाने विजेतेपद मिळवले होते, पण २०२१ च्या आयपीएल दरम्यान तो उत्कृष्ट अशी खेळी करू शकला नाही, त्यामुळे त्याला कर्णधार पदावरुन हटवण्यात आले होते. तसेच त्याला प्लेइंग इलेवनमधून सुद्धा वगळण्यात आले होते. त्यानंतर तो नाराज होता. तसेच त्याने बऱ्याचदा सोशल मिडीयाद्वारे अप्रत्यक्षरित्या नाराजी व्यक्त केली होती.
सनरायजर्स हैदराबाद संघासाठी वॉर्नरने ४००० हुन अधिक धावा करुनही २०२१ मध्ये सातत्याने धावा न केल्यामुळे आणि फ्रॅंचायझी सोबतच्या वादांमुळे २०२२ च्या आयपीएलसाठी त्याला संघात न ठेवण्याचा निर्णय फ्रँचायझीकडून घेण्यात आला. त्यामुळे आता तो आयपीएल २०२२ साठी खेळाडूंच्या लिलावात उतरेल.
त्यातच आयपीएल २०२१ नंतर युएई येथे झालेल्या टी२० विश्वचषकामधील त्याच्या शानदार कामगिरीमुळे त्याला संघात घेण्यासाठी आयपीएल संघांमध्ये चुरस पाहायला मिळू शकते.
दरम्यान, डेविड वॉर्नरने एका कार्यक्रमादरम्यान म्हटले आहे की, ज्याने तुमच्या संघासाठी खूप काही केले आहे, अशा कर्णधाराला तुम्ही संघातून वगळत आहे आणि त्याला पुन्हा संघात सामाविष्ट करत नाही. असे करून नव्या पिढीला यातून काय संदेश मिळेल. संघातील इतर खेळाडूंना काय संदेश मिळेल. मला सर्वात जास्त वाईट या गोष्टीच वाटतं की, माझ्यासोबत जे घडलं ते पाहून बाकी लोक असा विचार करतील की, माझ्यासोबत पण असं होऊ शकते.
पुढे वॉर्नर म्हणाला की, शेवटी जे काही घडलं त्याचा स्विकार करावा लागेल. जर तुम्हाला वाटत होते, तर तुम्ही यावर चर्चा करायला हवी होती. मी काही करणार नव्हतो. मी तेथे बसेन व ते जसे आहे तसेच त्याचा स्वीकार करेन. कारण तुम्ही मला संघासाठी निवडत नाहीये. मला माहीत होत की, या निर्णयामुळे चाहत्यांना दुख: होणार आहे. ते तेच आहेत जे फ्रॅंचायझी बनवतात. तेच आपल्या ब्रॅंडला मोठे करत असतात.
पुढे वॉर्नरने सांगितले की, जगातील प्रमुख संघांमध्ये आदर्श खेळाडू असतात. मी त्या संघात खूप काळापासून आहे. केन विलियम्सन आणि भुवनेश्वर हे सुद्धा खूप काळापासुन संघात आहेत. तुम्ही एक ब्रॅंड बनवता आणि त्या ब्रॅंडसोबत पुढे जात असता. मी जेथे खेळतो तेथील चाहत्यांशी नेहमी संपर्कात असतो. कारण मला माहीत आहे, चाहते हे खूप महत्त्वाचे असतात. मैदानात खेळणाऱ्या लहान मुलांना सचिन, विराट, विलियम्सन, स्टीव्ह स्मिथसारखं कोणी ना कोणी व्हायचं असत. आम्हाला त्यांच्याशी जोडून राहील पाहिजे. जर ते असं काही बघतील तर त्यांना दुख: होईल, असे वॉर्नरने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केपटाऊन कसोटीत विराटने ‘एवढ्या’ धावा केल्यावर मोडणार प्रशिक्षक राहुल द्रविडचा विक्रम
ऍशेसच्या चौथ्या सामन्यासाठी इंग्लंडने घ्यावी टीम इंडियाकडून प्रेरणा, माजी दिग्गजाचा सल्ला
आयसीसीच्या मानाच्या पुरस्कारासाठी मयंकला मिळाले नामांकन, ‘या’ दोघांशी करावी लागणार स्पर्धा