---Advertisement---

भारत-न्यूझीलंड अंतिम सामन्यादिवशी हवामान कसं असेल? जाणून घ्या संपूर्ण अंदाज

dubai international stadium
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा आता अंतिम टप्प्यावर आहे स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी 9 मार्च रोजी भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल आहे. तसेच करोडो भारतीय चाहते भारतीय संघाच्या विजयासाठी प्रार्थना करतील. चला तर जाणून घ्या की भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यादरम्यान हवामान कसे असेल आणि याचा खेळपट्टीवर किती परिणाम होऊ शकतो.

दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवरच भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी मधील त्यांचे सर्व सामने खेळले आहेत. तसेच याआधी 2 मार्चला भारत विरुद्ध न्यूझीलंड साखळी सामना याच मैदानावर खेळण्यात आला होता. जो सामना भारतीय संघाने जिंकला होता. सर्व सामन्यात या खेळपट्टीने संथ गतीने खेळ दाखवला आहे. रविवारी 9 मार्च रोजी दुबईच हवामान कसे राहील यावर फक्त चाहत्यांचच नाही तर दोन्ही संघाच्या कर्णधारांचं सुद्धा लक्ष लागले आहे. तसेच हवामानानुसार नाणेफेक झाल्यानंतर घेतलेला निर्णय बदलू शकतो.

खरंच पावसाच्या कारणाने दुबईतील अंतिम सामना रद्द होऊ शकतो? तर नाही. याचे उत्तर हेच असेल की दुबईमध्ये जास्त पाऊस पडण्याची शक्यता नाही, ज्यामुळे सामना रद्द केला जाऊ शकतो. पण थोडा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामानाच्या अंदाजानुसार रविवारी पाऊस पडण्याची शक्यता फक्त दहा टक्के आहे. 19 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने हवेतील वारे वाहू शकतात.

भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यादरम्यान हलक ढगांच वातावरण असेल. दुबईचे तापमान 30 डिग्री सेल्सिअस इतकं असेल. तसेच रात्री आठ वाजेपर्यंत सामन्यात कोणतीही अडचण येऊ शकत नाही.

अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी की फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य राहील?  तर नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय योग्य ठरू शकतो. भारतीय संघाने इथे प्रथम फलंदाजी करूनही तसेच धावांचा पाठलाग करूनही विजय प्राप्त केला आहे. येथील हवामान दुपारी खूप गरम असतं यामुळे प्रथम क्षेत्ररक्षण केल्यानंतर खेळाडू थकून जातात. तसेच नंतर गोलंदाजी करण्यासाठी कोणतीही अडचण येत नाही.

हेही वाचा 

भारत विरुद्ध न्यूझीलंड फायनल कोण जिंकणार? चॅट जीपीटी म्हणतंय….

फिफाचा धक्कादायक निर्णय, पाकिस्तान-रशियासह अनेक देश वर्ल्डकप बाहेर

रोहित शर्माच्या आठवणींना तडा! जिथे क्रिकेट शिकला ते मैदान जमीनदोस्त

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---